शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
2
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
3
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
4
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
5
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
6
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
7
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
8
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
9
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
11
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
12
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
13
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
14
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
15
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
16
गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत
17
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
18
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
19
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
20
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप

३९ लघु प्रकल्पांत फक्त ‘मृतसाठा’

By admin | Published: May 06, 2016 12:13 AM

सलग दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील १ मुख्य, ४ मध्यम व ७५ लघुप्रकल्पांची स्थिती बिकट आहे.

पाणीबाणी : २४ प्रकल्प कोरडे, उर्ध्व वर्धातही ४० टक्के ‘डेड वॉटर’ गजानन मोहोड अमरावतीसलग दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील १ मुख्य, ४ मध्यम व ७५ लघुप्रकल्पांची स्थिती बिकट आहे. सद्यस्थितीत २४ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे झाले असून ३९ लघु प्रकल्पांत केवळ मृतसाठा शिल्लक आहे. ४ मध्यम प्रकल्पातही सद्या ९.०४ दलघमी व उर्ध्व वर्धा प्रकल्पातही सध्या असणाऱ्या १४४.१० दलघमी साठ्यामध्ये ११४.२२ दलघमी मृतसाठा आहे. प्रकल्पात असणाऱ्या एकूण साठ्यापैकी रोज १ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पावसाळा माघारल्यास जिल्ह्याची तहान भागणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात एकमेव असणाऱ्या उर्ध्व वर्धा धरणात सद्यास्थितीत ५६४.०५ जीवंत साठ्याच्या तुलनेत १४४.१० दलघमी साठा शिल्लक आहे व यामध्ये ही ११४.२२ मृतसाठा असल्याने प्रत्यक्षतात २९.१० दलघमी जलसाठा असल्याची जलसंपदा विभागाची माहिती आहे. जिल्ह्यातील ४ प्रकल्पांपैकी शहानूर प्रकल्पात सद्यस्थितीत २०.५२ दलघमी जलसाठा शिल्लक आहे व यामध्ये ही १.८१ दलघमी मृतसाठा आहे. चंद्रभागा धरणात आज १५.४१ दलघमी जलसाठा आहे. यापैकी ०.१८ दलघमी मृतसाठा आहे. पूर्णा प्रकल्पात सद्या १४.५५ दलघमी जलसाठ्यामध्ये ८.१६ दलघमी मृतसाठा आहे व सपण प्रकल्पात सद्यास्थितीत असणाऱ्या १८.५४ दलघमी जलसाठ्या मध्ये ०.६६ दलघमी मृतसाठा आहे. एकूण चार मध्यम प्रकल्पात १६१.२६ जिवंत जलसाठ्यापैकी सद्यस्थितीत ७१.२७ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. यामध्येही ९.०४ दलघमी मृतसाठा आहे. जिल्ह्यात ७५ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये ८९२.७७ जलसाठ्याच्या तुलनेत सद्यास्थितीत ३७७.९१ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये २३६.३१ दलघमी मृतसाठा असल्याने या लघुप्रकल्पात फक्त १४१.६० दलघमी पाण्याचा साठा शिाल्लक आहे. यंदा जर पावसाळा माघारल्यास मृतसाठ्यावर तहान भागवावी लागेल.पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन मृग नक्षत्रात वेळेवर झाले तरीही मान्सून नियमित व्हायला जूनचा दुसरा आठवडा लागतो. त्यानंतर कोरड्या पडलेल्या जलप्रकल्पात पाण्याचा संचय होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सर्वच घटक यंदा मान्सून लवकर यावा असी प्रतीक्षा करीत आहे. एक दलघमी म्हणजे १०० कोटी लिटर एक दलघमी म्हणजे १०० कोटी लीटर पाणी जिल्ह्यात एकमेव मुख्य असणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सद्यास्थिीत १४४.१० दलघमी म्हणजे १४४ कोटी लिटर पाण्याचा साठा शिल्लक आहे. पाणी पुरवठा योजना , शेती व औद्योगिक क्षेत्रासाठी दररोज या पाण्याचा वापर होत आहे व सद्यास्थितीत असणाऱ्या जलसाठ्यापैकी १०० कोणी लिटर पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे.