शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

अमरावती जिल्ह्यातील वरूडमध्ये ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी; दोन हजारांवर नागरिक स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2022 9:40 PM

Amravati News नदीनाल्यांना आलेला पुरामुळे वरुड तालुक्यातील ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या बाधित कुटुंबांतील किमान दोन हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देएक व्यक्ती वाहून गेला; १५ जनावरे मृत

अमरावती : दहा दिवसांची उसंत घेतल्यानंतर पुन्हा पावसाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. २४ तासात वरुड तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नदीनाल्यांना आलेला पुरामुळे वरुड तालुक्यातील ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या बाधित कुटुंबांतील किमान दोन हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे. पुरामध्ये एक व्यक्ती वाहून गेला व त्याचा शोध पथक घेत आहेत. याशिवाय लहान-मोठ्या १५ जनावरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जिल्ह्यात सार्वत्रिक ३०.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये वरूड तालुक्यात सर्वाधिक ९२ मि.मी. पाऊस झाला आहे. या तालुक्यातील शेंदूरजना घाट मंडळात ११०.२५ मि.मी., पुसला ११०.२५, वरूड ९६.७५, बेनोडा ७५ व वाठोडा १००.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी लोणी सर्कलमध्ये व त्यापूर्वी २५ जुलै रोजी वरूड तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. या तालुक्यात सरासरीच्या १५२ टक्के पाऊस झालेला आहे.

संततधार पावसामुळे ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचा येवा वाढल्याने पाचव्यांचा १३ ही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. विसर्ग यावेळी जास्त असल्याने नदीनाल्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहे. याशिवाय १४०० हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

४८० घरांची पडझड

अतिवृष्टीमुळे वरुड तालुक्यात ३४९ घरांची व मोर्शी तालुक्यात ३० घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय वरुड तालुक्यात ८१ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली आहेत. या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे. नुकसानीचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी पंचनामे करीत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

वर्धा ओव्हरफ्लो; अमरावती - वर्धा राज्यमार्ग बंद

पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे सर्वच दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आलेला आहे व कौंडण्यपूर येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने अमरावती व वर्धा या राज्य महामार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. याशिवाय नालेदेखील दुथडी भरून वाहत आहेत.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ऊर्ध्व वर्धा, नागठाणा, पाक नदी धरण, सपण, पूर्णा, निम्न वर्धा आदी प्रकल्पांमध्ये अतिवृष्टीमुळे येवा वाढला आहे. त्यामुळे या प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले व विसर्ग सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

टॅग्स :floodपूर