शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

अमरावती : नाफेडच्या ४६ केंद्रांना टाळे, खासगीत व्यापाऱ्यांनी पाडले भाव

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 21, 2023 6:31 PM

हे षडयंत्र असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

अमरावती :   हरभरा खरेदीसाठी नाफेडचे पोर्टलच जिल्हात दोन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने ४६ खरेदी केंद्रांना टाळे लागले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे फावले. बाजार समित्यांमध्ये पाच दिवसांत क्विंटलमागे ३०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव पडले आहेत. हे षडयंत्र असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

केंद्र शासनाने हरभऱ्यासाठी यंदा ५३३५ रुपये क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात खासगीमध्ये हा भाव मिळत नसल्याने नाफेडद्वारे डीएमओच्या दहा, व्हीसीएमएफच्या १० व अन्य सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनीच्या १६ अशा एकूण ४६ केंद्रांमध्ये साधारणपणे पाच लाख क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आलेली आहे. नाफेडद्वारा जिल्ह्यातील एकूण हरभरा उत्पादनाच्या २५ टक्के हरभरा खरेदीचे लक्ष्यांक देण्यात आले होते व ही खरेदी झाल्याने आता बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना खासगीमध्ये हरभरा विक्रीशिवाय पर्यात उरला नाही. यामध्ये दर पडल्याने आता शेतकऱ्यांची लूट होत आहे.

गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहे. त्यामुळे रब्बीवरच या सर्व शेतकऱ्यांची मदार होती. मात्र, हरभऱ्याला सुरुवातीपासूनच भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च पदरी पडणार की नाही, अशी शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निदर्शने

जिल्ह्यात हरभऱ्याची खरेदी बंद करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांनी शुक्रवारी जिल्हा विपणन कार्यालयात निदर्शने केली. अवकाळी वातावरणाने शेतकरी केंद्रांवर हरभरा आणू शकले नाहीत, त्याममुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.