शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

लालपरीच्या ५० फेऱ्या बंद, महिन्याकाठी सव्वाकोटीचा फटका; प्रवाशांची गैरसोय

By जितेंद्र दखने | Published: April 05, 2023 7:01 PM

राज्य परिवहन महामंडळाचे एकीकडे प्रवाशांना विविध सवलती देऊन एसटीने प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

अमरावती: राज्य परिवहन महामंडळाचे एकीकडे प्रवाशांना विविध सवलती देऊन एसटीने प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे, तर दुसरीकडे अमरावती विभागातील १०४ एसटी बस एक्स्पायर झाल्याने गत दोन वर्षांपासून लांब पल्ल्याच्या २१ आणि मध्यम पल्ल्याच्या २९ बस फेऱ्या, अशा एकूण ५० फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत. परिणामी, दिवसाला १५ हजार किलोमीटर प्रवास कमी झाला आहे. त्यामुळे एसटीला दिवसाकाठी साडेचार लाख रुपयांचा अन् महिन्याकाठी सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. 

पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची यामुळे गैरसोय होत आहे. त्यांना नाइलाजाने खाजगी ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेचा पर्याय शोधावा लागत आहे. अमरावती विभागाने एसटी महामंडळाकडे १०० नवीन बसची मागणी केली आहे. त्यापैकी २० बस आगामी काही दिवसांत मिळणार असल्या तरी आजघडीला ज्या बस आहेत. त्यांचीही स्थिती फारशी चांगली नाही. त्यापैकी काही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. बसची संख्या जर पुरेशी नसेल, तर साहजिकच फेऱ्या कमी होतील. प्रवाशांना त्या त्यावेळी प्रवास करता येणार नाही.

मग सवलत देऊन फायदाच काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने अमरावतीला विभागात नवीन बस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग हे एसटीमधून मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून एसटीने विभागातील एसटी फेऱ्या कायम ठेवल्या असल्या तरी लांब व मध्यम पल्ल्याच्या फेऱ्या कमी केल्याने लांबवर प्रवास करणारे प्रवासी सध्या त्रस्त आहेत. सध्या अमरावती विभागात ४५ शिवशाही अन् ३ हिरकणी आहेत. या दोन्ही प्रकारच्या बस आरामदायक असल्याने लांब पल्ल्यासाठी वापरल्या जातात; परंतु सध्या त्यापैकी काही या जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी, तसेच नागपूर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या शहराकडे पाठवण्यात येतात. त्यांच्याही फेऱ्या कमी झाल्या आहेत.

२० ते ३० रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे प्रवास भाडेलांब पल्ल्याच्या किंवा मध्यम पल्ल्याच्या बससाठी २० ते ३० रुपये प्रति किलोमीटर भाड्याखाली जाते; परंतु पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या शहरांकडे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या आधीच्या तुलनेत आता ५० टक्के कमी केल्यामुळे साहजिकच उत्पन्नातही घट झाली आहे. २० ते ३० रुपये किमी दराने विचार करता एसटीचे दररोज ४ लाख ५० हजारांचे, तर महिन्याला सुमारे १ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न बुडत आहे.

एसटी बसची संख्या कमी झाल्यामुळे लांब व मध्यम पल्ल्याच्या बसच्या फेऱ्या या निम्म्याने कमी कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे एसटीला दिवसाला सुमारे साडेचार लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या फेऱ्या कमी करून जिल्ह्यातील फेऱ्या कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. - नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, अमरावती ४०५ पैकी ३६१ बस विभागाकडेगत दोन वर्षांपूर्वी अमरावती विभागाकडे ४६५ बस होत्या. त्यापैकी १०४ बस निर्लेखित केलेल्या आहेत. ३६१ बस आहेत. त्यातील सर्वच बस एकाच वेळी रस्त्यावर धावत नाहीत. काही बस दुरुस्ती, आरटीओ पासिंगसाठी जातात. 

टॅग्स :Amravatiअमरावती