शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

१.८५ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 12:50 PM

Amaravati : सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गतवर्षीच्या कपाशी सोयाबीनला भाव न मिळाल्याने भावांतर योजनेच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार व दोन हेक्टर मर्यादेत अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,८४,५४४ शेतकऱ्यांनी कृषी सहायकाकडे ई-केवायसी केली असल्याने त्यांच्या खात्यात पेरणी क्षेत्राच्या अनुषंगाने अर्थसाहाय जमा होत आहे. त्यामुळे सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मागच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने सरासरी उत्पन्नात कमी आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे शेतमालास हमीभावदेखील मिळाला नाही. त्यामुळे राज्य शासनाने भावांतर योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजार देण्याची घोषणा केली होती, त्याची अंमलबजावणी दोन दिवसांपासून सुरू झालेली आहे. गतवर्षी ई-पीक पाहणी केलेल्या ३,५३,६८३ शेतकऱ्यांच्या याद्या जमाबंदी विभागाने कृषी विभागाला पुरविल्या होत्या व यामध्ये नावे असलेल्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सध्या जिल्ह्यात सुरू आहे. शासनाद्वारा २९ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अर्थसाहाय्य जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया ३० पासून सुरू झाली आहे. अद्याप ४६,२४६ शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया केली नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

याद्या प्राप्त शेतकरी : ३,५३,६८३ कपाशीकरिता टार्गेट : १,५२,३४२ सोयाबीनसाठी टार्गेट : २,०१,३४१ आतापर्यंत केवायसी : १,८४,५४४ ई-केवायसी प्रलंबित : ४६.२४६

अर्थसाहाय मिळालेले तालुकानिहाय शेतकरी अचलपूर १०,६५३, अमरावती २२,८६४, अंजनगाव सुर्जी १६,२४६, भातकुली १४,४०५, चांदूर रेल्वे १३,०८१, चांदूर बाजार १४,८१६, चिखलदरा ४,९०१, दर्यापूर १९,८७५, धामणगाव रेल्वे १२,३४४, धारणी ६,६४४, मोर्शी १५,९६६, नांदगाव खंडेश्वर १९,८७२, तिवसा १३,३६५, व वरूड तालुक्यात ९५१२ शेतकऱ्यांना अर्थसाहाय मिळण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे.

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती