शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
3
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
4
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
5
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
6
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
7
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
8
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
9
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
10
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
11
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
12
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
13
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
14
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
15
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
16
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
17
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
18
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
19
"पहिल्या सीझनला मला स्पर्धक म्हणून ऑफर होती", केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, 'शो स्क्रीप्टेड...'
20
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

पश्चिम विदर्भात आपत्तीमुळे ५५ व्यक्तींचा मृत्यू; ३७७ जनावरे मृत

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 10, 2024 6:36 PM

Amravati : अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील ७६७ गावे अन् २०३३ कुटुंबे बाधित

अमरावती : पश्चिम विदर्भातील सर्व तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केलेली आहे. सततचा पाऊस, अतिवृष्टी या आपत्तीमुळे  ५५ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. शिवाय लहान-मोठी ३७७ जनावरे मृत झालेली आहेत. ४३०८ घरांची पडझड झालेली आहे. विभागात ३७ तालुक्यांतील ३७ तालुके ७७० गावांना या आपत्तीचा फटका बसला. यामुळे २०३३ कुटुंबे बाधित झाल्याचा विभागीय आयुक्तांचा अहवाल आहे.

अमरावती विभागात १ जून ते १० सप्टेंबर या कालावधीत ६६२.५ मिली पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७९१ मिमी पावसाची नोंद झाली. ही ११९.४ टक्के सरासरी आहे. गतवर्षी याच तारखेला ८६.२ टक्के पाऊस झाला होता. सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात ३९ व्यक्ती वाहून गेल्या आहेत. तर वीज कोसळून १० जणांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय अंगावर भिंत कोसळल्याने ३ व इतर कारणांनी ३ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. यामधील ३४ प्रकरणांत आतापर्यंत १.३६ कोटींचे सानुग्रह अनुदान देण्यात आलेले आहे.

आपत्तीमुळे मोठी दुधाळ ८८, लहान दुधाळ २२४, ओढकाम करणारी ५५ व ओढकाम करणारी लहान १० असे एकूण ३७७ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. याबाबत पशुपालकांना सानुग्रह अनुदान देण्यात आलेले आहे. 

४३०८ घरांची पडझडया आपत्तीमध्ये ६३ घरांची पूर्णत: पडझड झालेली आहे, तर ७८० घरांची अंशत: पडझड झाली. शिवाय ३४६० कच्च्या घरांची पडझड झालेली आहे. यामध्ये ५ झोपड्या, तर १३७ गोठे नष्ट झाले आहेत. याबाबत स्थानिक प्रशासनाद्वारा सर्व्हे करण्यात येत असून, पात्र प्रकरणात महसूल विभागाद्वारा सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान

  • अतिवृष्टीमुळे विभागात २,५२,८३९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले, तर नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे १४७९ हेक्टरमधील पिके खरडली गेली, तर पुरामुळे १६३ हेक्टरमध्ये गाळ साचल्याने पिकांचे नुकसान झालेले आहे.
  • अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात १,७५,६२७ हेक्टर, अमरावती ५,८११ हेक्टर, अकोला ५१,०५६, वाशिम १०,४१२ हेक्टर व बुलडाणा जिल्ह्यात ९,९३३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
टॅग्स :floodपूरVidarbhaविदर्भAmravatiअमरावती