शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प्रक्रियेअभावी शेतकऱ्यांचे ६९ कोटी शासनाकडे पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 15:03 IST

Amravati : शेतकऱ्यांशी संपर्क करण्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे : आपत्तीच्या काळात शासनाद्वारे बाधित शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. यामध्ये सन २०२२ पासून १२ वेळा शासनाने मदतनिधी उपलब्ध केला आहे. परंतु, ८५ हजार शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक (व्हीके) प्राप्त असतानाही त्यांनी ई केवायसी केलेली नाही. त्यामुळे ६९ कोटींचा निधी शासनाकडे पडून आहे. या शेतकऱ्यांशी संपर्क करून त्यांना शासन निधीचा लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

ई-केवायसी झाल्यानंतरच नुकसान भरपाईची रक्कम संबंधित शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रलंबित ई-केवायसीचे काम मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले आहेत.

अतिवृष्टी, गारपीट, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते. भरपाईची रक्कम डीबीटीद्वारे संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. अनेक शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी नसल्याने सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे महसूल व कृषी यंत्रणेद्वारे संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क करून प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

या कारणांमुळे ई- केवायसी प्रलंबितअमरावती विभागात २४,४२,२८४ शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली असून, ७४,८०८ शेतकऱ्यांची ई-केवायसी विविध कारणांमुळे प्रलंबित आहे. बोटांचे ठसे न उमटणे, मृत शेतकरी, ठिकाण बदलून गेलेले शेतकरी, आदी तांत्रिक कारणांमुळे ई-केवायसी होणे बाकी आहे, अशा शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात येणार आहे.

प्रक्रियेअभावी प्रलंबित शासन निधीजून व जुलै २०२२ मधील पावसाचे नुकसान १०.६६ कोटी, ३१ मार्च २०२३ मधील अवकाळीचे ४.८५ लाख, ७ एप्रिल २०२३ रोजी अवकाळी १२.७० लाख, ८ ते ३० एप्रिल २०२३ अवकाळीचे १.०६ कोटी, में २०२३ अवकाळीचे ८९ लाख, सप्टेंबर २०२२ अतिवृष्टीचे ७० लाख, मार्च २०२३ अवकाळीचे ३० लाख, सप्टेंबर २०२३ अतिवृष्टीचे ३.२४ कोटी, जून व जुलै २०२२ अतिवृष्टीचे १.५९ कोटी, नोव्हेंबर २०२३ अवकाळीचे ३२.८१ कोटी, जुलै २०२३ अतिवृष्टीचे ६.३४ कोटी, २०२२ फळपीक अनुदानाचे ५.८७ कोटी पडून आहेत. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती