शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

एसटीच्या ७० टक्के बसफेऱ्या झाल्या पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:10 AM

अमरावती : कोरोनाकाळात एसटीची चाके थांबली होती. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. मात्र, आता अनलॉकमध्ये ६५ ते ७० ...

अमरावती : कोरोनाकाळात एसटीची चाके थांबली होती. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. मात्र, आता अनलॉकमध्ये ६५ ते ७० टक्के बसफेऱ्या पुन्हा सुरू झाल्या असून, त्यातून एसटीला प्रतिदिन २४ लाखांवर उत्पन्न मिळत आहे. मात्र, ज्या मार्गावर एसटीला प्रवासी मिळत नाही, अशा ठिकाणच्या ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंदच असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.

कोरोनाकाळापूर्वी अमरावती जिल्ह्यातून एसटीच्या प्रतिदिन ३५० बसेसच्या २१०० फेऱ्या जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यात राज्यभर व्हायच्या. त्यातून एसटीला प्रतिदिन ३६ ते ३७ लाखांचे उत्पन्न मिळायचे. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग व टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बसफेऱ्या बंद होत्या. त्यामुळे एसटीचे उत्पन्न फारच कमी झाले होेते. मात्र, आता अनलॉकमध्ये ९६२ फेऱ्या होत आहेत. त्यातून बुधवारी एसटीला मिळालेल्या उत्पन्न २४ लाख ९ हजार एवढे होते. जिल्ह्यात ३७१ एसटी बसेस असून त्यापैकी २५० बसेस रस्त्यावर धावत आहेत. ग्रामीण भागात चांगला रिस्पोन्स मिळाल्यानंतर बससेवा सुरू करण्यात येईल, असे विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले.

बॉक्स

नागपूर मार्गावर सर्वाधिक बसेस

अमरावती-नागपूर मार्गावर सर्वाधिक बसेस सोडण्यात आल्या आहेत. त्यानंतर अमरावती- परतवाडा, अमरावती - अकोट, अमरावती- वरूड, मोर्शी तसेच जिल्ह्याच्या ठिकाणावरून तालुक्याच्या ठिकाणी बसेस जात आहेत. तसेच अकोला, औरंगाबाद, पुणेसाठी बसेस धावत आहेत.

कोट

ज्या मार्गावर जास्त उत्पन्न आहे. तेथे बससेवेला आधी प्राधान्य दिले आहे. ग्रामीण भागात प्रवासी मिळाल्यानंतर बससेवा पूर्ववत करण्यात येईल. आता ७० टक्के बसेस पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.

श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक एसटी अमरावती