शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग; ३७ वर्षांपूर्वीचा तो काळा दिवस

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 19, 2023 5:39 PM

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली, शेतकरी स्वातंत्र्याचा निर्धार

अमरावती : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी व शेतकरीविरोधी कायद्यांचा विरोध करण्यासाठी पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ रविवारी एक दिवसाचा उपवास करण्यात आला. संयुक्त किसान मोर्चा, आपुलकी परिवार व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाद्वारा हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यामध्ये अनेक जण सहभागी झाले होते.महाष्ट्रात ३७ वर्षांपासून अखंडपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती समजून उपाययोजना करायला पाहिजे होती. दुर्दैवाने तसे झालेले नाही. त्यामुळे नागरिक म्हणून सर्वांची जबाबदारी वाढते. या पार्श्वभूमीवर १९ मार्चचे उपोषण शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करणारे ठरले, हे आंदोलन शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करणारे असल्याचे उपस्थितांनी सांगितले. आंदोलनात प्रकाश साबळे, संजय पांडव, प्रमोद कुचे, दिलीप काळे, हरिभाऊ मोहोड, पौर्णिमा सवाई, विजय विल्हेकर, धनंजय काकडे, नितीन पवित्रकार, धनंजय तोटे, नीलेश उभाड, राहुल तायडे, अशिष काळमेघ, मिलिंद वंजारी, किरण महल्ले, अमोल भारसाकळे यांच्यासह अनेक नागरिक व सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

१९ मार्च १९८६ ला जाहीर झाली पहिली शेतकरी आत्महत्या

साहेबराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावचे शेतकरी होते. शेती परवडत नाही, दरवर्षी तोटाच होतो. म्हणून अस्वस्थ होते, १९ मार्च १९८६ रोजी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन ते पवणार आश्रमात गेले. सविस्तर पत्र लिहिले. रात्री जेवणात विषारी औषध कालवून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. या घटनेला ३७ वर्षे होतात. म्हणून उपवासासाठी १९ मार्चची तारीख निवडण्यात आल्याचे धनंजय काकडे म्हणाले. 

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावतीYavatmalयवतमाळfarmer suicideशेतकरी आत्महत्या