शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
5
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
6
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
7
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
8
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
9
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
10
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
11
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
12
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
15
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
16
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
17
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
18
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
19
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
20
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  

अस्मानी, सुलतानी संकटाचे १९ हजार बळी, धोरणात्मक निर्णय केव्हा घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 11:23 AM

आठ तासात एक शेतकरी आत्महत्या : संघर्षावर नैराश्य भारी, धक्कादायक वास्तव

गजानन मोहोड

अमरावती : दोन दशकांपासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबलेले नाही. या कालावधीत पश्चिम विदर्भात १८,५९५ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. दर आठ तासात एक शेतकरीमृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अस्मानी व सुलतानी संकटांचे हे शेतकरी बळी ठरले आहेत. बळीराजा संकटाच्या गर्तेत असतांना त्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी ठरत आहे.

शेतकरी आत्महत्यांची नोंद सन २००१ पासून प्रशासनाद्वारा घेतली जाते. त्यानुसार ऑक्टोबर २०२२ अखेरपर्यंत विभागात १८,५९५ शेतकरी आत्महत्या झाल्या असल्या तरी शासन मदत ८,५७६ शेतकरी परिवारांना मिळाली आहे. यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त ९,८२० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. याशिवाय दहा महिन्यात १९९ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी मृत्यूनंतरही त्याच्या मागचा त्रास संपलेला नाही.

निसर्गाच्या लहरीपणामुळे अलीकडे सतत नापिकी होत आहे. योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळत नाही. सिंचनाचा अनुशेष वाढतोच आहे. कृषी निविष्ठांचे दर वाढत आहेत. कृषिपंपाच्या जोडण्या प्रलंबित आहेत. जिरायती शेती का परवडत नाही, याचाही शोध घेणे गरजेचे आहे.

शासन मदतीचे निकष १६ वर्षांपूर्वीचे

शेतकरी आत्महत्याप्रकरणी शासन मदतीचे निकष २३ जानेवारी २००६पासून बदललेले नाहीत. यामध्ये ३० हजार रोख व ७० हजार रुपये पोस्ट किंवा बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेत मृत शेतकऱ्याच्या वारसाच्या नावे ठेवले जातात. प्रकरण मंजुरीसाठी कित्येक महिन्यांचा कालावधी लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

उत्पादन खर्च व उत्पन्नाचा मेळ जुळणार केव्हा?

बँकांचे व सावकारांचे कर्ज, कर्जवसुलीसाठी तगादा, नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, आजारपण आदी शेतकरी आत्महत्यांची प्रमुख कारणे आहेत. शेती परवडणारी नसल्याने उत्पादन खर्च व उत्पन्नाचा मेळ जुळत नाही. यामुळे मुला - मुलींचे शिक्षण, लग्न, उदरनिर्वाह कसा करावा, या कारणावरूनही मानसिकता खचत असल्याचेही समोर आले आहे.

२००१ पासून आलेख वाढताच

सन २००१मध्ये विभागात ४९ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. त्यानंतर २००२ (८०), २००३ (१३४), २००४ (४१९), २००५ (४१९), २००६ (१,२९५), २००७ (१,११९), २००८ (१,०६१), २००९ (९०५), २०१० (१,०५१), २०११ (८८६), २०१२ (८४२), २०१३ (७०५), २०१४ (८३०), २०१५ (१,१८४), २०१६ (१,१०३), २०१७ (१,०६६), २०१८ (१,१४६), २०१९ (१,०५५), २०२० (१,१३७), २०२१ (१,१७९) व ३१ ऑक्टोबरपर्यंत ९३० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीDeathमृत्यूVidarbhaविदर्भ