शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

४ जुलैला मोठी खगोलीय घटना घडणार; पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 6:26 PM

खगोलीय घटना : या दिवशी राहणार १५२ दशलक्ष कि.मी.चे अंतर

अमरावती : खगोलशास्त्रानुसार ४ जुलै रोजी पृथ्वी व सूर्यामधील अंतर सर्वात जास्त राहणार आहे. याला ‘एपीहॅलिऑन’ म्हटले जाते. पृथ्वी व सूर्यामधील सरासरी अंतर १५ कोटी कि.मी. आहे. या अंतराला खगोलशास्त्रात एक खगोलीय एकक म्हटले जाते. या दिवशी हे अंतर १५२ दशलक्ष कि.मी. राहणार आहे. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार असल्याने अशी घटना घडत असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले.

सूर्य हा तप्त वाळूचा गोळा असून यामध्ये हायड्रोजनपासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र सुरू असते. सूर्याच्या केंद्रामध्ये एका सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळतो. त्यापासून ६५ कोटी २५ लाख टन हेलीयन बनतो. कमी झालेल्या ४५ लाख टन वस्तुमानाचे रूपांतर सौरऊर्जेमध्ये होते. सूर्यावरील ज्या भागाचे तापमान कमी होते, त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असते. या डागांचा शोघ १८४३ मध्ये श्वाबे या वैज्ञानिकाने लावला.

या डागाचे आतापर्यंत २३ चक्र पूर्ण झाले. फेब्रुवारी २००८ पासून २४ वे चक्र सुरू झाले आहे. मानवनिर्मित उपग्रहावर या डागाचा परिणाम होतो. दर १ लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंमी ओढली जात आहे व पाच खंडदेखील हळूहळू सरकत असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.

सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे१) सूर्याचे वय निश्चित करणारे पहिले वैज्ञानिक सर आर्थर एडिंग्टन आहे. त्यांच्यानुसार सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे आहे. त्यापैकी ५ अब्ज वर्षे संपली आहेत. आणखी ५ अब्ज वर्षांनी सूर्याचा मृत्यू श्वेत बटू ताऱ्यामध्ये होईल.

२) सूर्यावरून कधी कधी चुंबकीय लहरी फेकल्या जातात. त्यामुळे चुंबकीय वादळे येतात. १८५९ मध्ये असेच वादळ आले होते. त्यामुळे जगातील टेलीग्राफ यंत्रणा बंद पडली होती. या वादळाला ‘केरीटन इव्टेट’ हे नाव दिले आहे.

टॅग्स :Earthपृथ्वी