शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मेळघाटात रुग्णवाहिकेअभावी बाळासह गर्भवती माता दगावली!

By उज्वल भालेकर | Updated: September 1, 2024 19:37 IST

दहेंद्री येथील घटना, आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर

अमरावती: बाल आणि मातामृत्यूच्या घटनेमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मेळघाटच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दहेंद्री या गावातील एका गर्भवती महिलेला वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तिची घरीच प्रसूती झाली. यामध्ये तिच्या बाळाचा मृत्यू झाला. तर प्रसूतीमध्ये प्रकृती बिघडलेल्या ‘त्या’ २० वर्षीय मातेचादेखील इर्विनच्या आयसीयू विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने मेळघाटातील आरोग्याच्या सुविधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

मेळघाटातील आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर आहे. आजही येथील दुर्गम भागातील रहिवासी नागरिकांना उपचार सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आजही कायम आहे. चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री या गावातील रहिवासी कविता अनिल साकोम (२०) ही गर्भवती महिलेला शनिवारी सकाळपासून प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. यावेळी या महिलेच्या नातेवाइकांनी याची माहिती देत रुग्णवाहिकेची मागणी आरोग्य विभागाला केली होती. परंतु रुग्णवाहिका येण्यास तीन ते चार तासांचा वेळ लागणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. अखेर या महिलेची घरीच प्रसूती झाली. परंतु यामध्ये तिचे बाळ मृत जन्माला आले.

या प्रसूतीनंतर कविताची प्रकृती बिघडत असल्याने तिला लगेच खासगी वाहनाने चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु तिची प्रकृती जास्तच बिघडत असल्याने तिला तेथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. परंतु कविता उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे पाहून येथूनही तिला जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे रेफर करण्यात आले. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास कविताला घेऊन तिचे नातेवाईक इर्विनमध्ये आले. येथे तिला तपासणी करून वेळीच आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. परंतु रविवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान कविताचा मृत्यू झाला. प्रसूतीच्या वेळीच रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली असती तर कविता आणि तिचे बाळही वाचले असते असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.पत्नीला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिकेसाठी कॉल केला होता. परंतु रुग्णवाहिका मिळाली नाही, त्यामुळे घरीच प्रसूती झाली. त्यानंतर पत्नीलाही न्यायला रुग्णवाहिका मिळाली नसल्याने खासगी वाहनाने तिला चुरणी येथे नेले होते. परंतु तेथून अचलपूर नंतर अमरावती रेफर करण्यास सांगितले. जर वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर कदाचित माझी पत्नी आणि बाळाचाही जीव वाचले असते.- अनिल साकोम, मृत कविताचा पती

टॅग्स :Amravatiअमरावती