शहरं
Join us  
Trending Stories
1
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
2
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
3
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
4
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
5
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
6
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
7
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
8
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
9
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
10
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
11
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
12
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
13
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
14
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
15
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
16
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
17
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
18
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
19
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
20
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

कोरोनानंतर आता ‘यास’ वादळाने रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:12 AM

अमरावती : कोरोनामुळे प्रवाशी संख्या घटल्याने यापूर्वी रेल्वे बोर्डाने बहुतांश गाड्या ३० जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ...

अमरावती : कोरोनामुळे प्रवाशी संख्या घटल्याने यापूर्वी रेल्वे बोर्डाने बहुतांश गाड्या ३० जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पश्चिम बंगालच्या उपसागरातून ‘यास’ वादळाचे संकट उभे ठाकल्याने हावडा येथून धावणाऱ्या बहुतांश रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

पुरी-एलटीटी (०२१४६), सुरत-पुरी (०२८२८), पुरी-अहमदाबाद (०२८४३), ॲडिशनल पुरी (०२८४४), एलटीटी- हावडा (०२१०१), हावडा-एलटीटी (०२१०२), हावडा-पोरबंदर (०२२२१), पोरबंदर-हावडा (०२२२२), सुरत- पोरबंदर(०२८१७), पोरबंदर-सुरत (०२८१८), पुरी ॲडशिनल (०२०३७), पुरी- जेयू (०२०९४) या रेल्वे गाड्या २९ मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावती रेल्वे स्थानकाहून अमरावती-मुंबई, अमरावती-सुरत, अमरावती-पुणे, अमरावती-जबलपूर या गाड्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. अजनी-पुणे, हावडा-कुर्ला शालिमार एक्सप्रेस, गोंदिया-कोल्हापूर, हावडा-पुणे आझाद हिंद, हावडा-कुर्ला सुपर डिलक्स, पुरी-ओखा, हावडा-पुरी रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘यास’ हे वादळ अतिशय धोकादायक ठरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे हावडा आणि पुरी येथून ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्या तूर्त बंद करण्यात आल्या आहेत. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस प्रवाशांअभावी रद्द करण्यात आल्याने रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

--------------------

आरक्षण खिडक्यांवर ‘रिफंड’साठी गर्दी

भुसावळ-नागपूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांनी तिकीट रिफंड मिळविण्यासाठी रेल्वे स्थानकांवर धाव घेतली आहे. अमरावती रेल्वे स्थानकावरून दरदिवशी लाख ते सवालाख रुपये रिफंड दिला जात असल्याची माहिती आहे.