शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

‘पहिली’साठी ५ वर्ष ८ महिने वयोमर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 22:47 IST

राज्यात प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्याला ३० सप्टेंबर २०१८ रोजी पाच वर्ष आठ महिने वय पूर्ण असणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे आदेश : अन्यथा प्रवेश करणार रद्द

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यात प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्याला ३० सप्टेंबर २०१८ रोजी पाच वर्ष आठ महिने वय पूर्ण असणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तशा आशयाचा एक आदेश पारित केला आहे. यापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना पहिलीत प्रवेश देण्यात आला, तर हे प्रवेश रद्द ठरविले जातील, असा इशारा प्राथमिक शिक्षण विभागाने दिला आहे.पहिलीच्या प्रवेशासाठी राज्यात वयोमर्यादेविषयी आजपर्यंत मोठा घोळ सुरू होता. सर्वसाधारणपणे पहिलीतील प्रवेशासाठी वय पाच वर्ष पूर्ण हा निकष गृहीत धरून शाळांमध्ये प्रवेश दिले जात होते, तर काही ठिकाणी पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच प्रवेश देण्याचा पराक्रम संस्थाचालकांनी केला होता.बालमानसशास्त्र अभ्यासकांच्या मते, बालकांना त्यांच्या मेंदूची पूर्ण क्षमतेने वाढ होण्यापूर्वी शाळेमध्ये पहिलीत प्रवेश दिल्यास, त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होतो. हा धोका अनेकदा निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतरही राज्यात कमी वयात शाळेत प्रवेश देण्याचे प्रकार सुरू आहेत. यामध्ये विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळा आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेच ही वयोमर्यादा घालून दिली आहे. यापुढे ३० सप्टेंबर रोजी ५ वर्ष ८ महिने पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पहिलीच्या इयत्तेत प्रवेश मिळणार आहे. ही वयोमर्यादा मराठी असो वा इंग्रजी, प्रत्येक माध्यमाच्या शाळेसाठी ही अनिवार्य आहे.३० सप्टेंबर ऐवजी ३० जुलै!पहिल्या इयत्तेत प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने वय निश्चित केले आहे. प्रत्येक शाळेसाठी ते बंधनकारक आहे. इंग्रजी माध्यमाच्या काही शाळा त्यांचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी प्राथमिक शिक्षण संचालकांकडे आल्या आहेत. त्या शाळांनी ३० सप्टेंबरऐवजी ३१ जुलै ही तारीख वय निश्चितीसाठी ग्राह्य धरून प्रवेश सुरू केले आहेत. नर्सरी, ज्युनिअर-सिनीअर केजीतील मुलांना पहिलीत आणण्यासाठी हा नियम डावलला जात आहे.