शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
5
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
6
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
7
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
8
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
9
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
10
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
11
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
13
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
14
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
15
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
16
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
17
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
19
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
20
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का

'आधीच अडीच वर्षे राज्याचे नुकसान झालंय', नवनीत राणांची दोन्ही नेत्यांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 3:39 PM

अमरावती - अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला पोहचला आहे. विशेष म्हणजे ...

अमरावती - अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला पोहचला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला. तरीही, राणा विरुद्ध कडू यांच्यातील वाद पुन्हा समोर आला आहे. बच्चू कडूंनी जाहीर सभेतून टीका केल्यानंतर राणांनीही दम भरला. त्यानंतर, आमदार रवि राणा यांनीही प्रत्युत्तर देत बच्चू कडूंना थेट आव्हान दिलं. त्यामुळे, पुन्हा एकदा दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी आता प्रथमच खासदार नवनीत राणा यांनी भाष्य केलं आहे.  

राणा विरुद्ध कडू यांच्यातील वादावर खासदार नवनीत राणा यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. रवी राणा व बच्चू कडू यांना दोघांनाही त्यांनी विनंती केली आहे, ''आधीच अडीच वर्ष राज्याचे नुकसान झाले आहे, आता सक्षम सरकार आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे दोघांनी एकत्रित यायला पाहिजे, आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न मार्गी लावा. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपले मतभेद बाजूला ठेवा,'' अशी विनंती नवनीत राणा यांनी दोघांना केली. पती रवि राणा यांनाही एकप्रकारे त्यांनी आवाहनच केलं आहे. त्यामुळे, लवकरच या वादावर आता पडद पडण्याची शक्यता आहे.        

काय म्हणाले बच्चू कड़ू

रवि राणा यांच्यासोबतच्या वादावर बोलताना कडू म्हणाले की, माध्यमांनी हा वाद वाढवू नये, सभेत मी शाळांबाबत चांगलं बोललो होतो, ते नाही दाखवलं पण वादाचं तेवढं दाखवलं. आमच्याकडून हा वाद नाही थांबला, तर मीडियाने थांबवलं पाहिजे. मीडियाने चांगले विषय घ्यावेत, असेही कडू यांनी म्हटले. मी राणांचे आभार मानले, ते दोन पावलं मागे येत असतील तर मी ४ पाऊलं मागे येईल, असेही मी सभेत बोललो. मी आत्ता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जात आहे. माझ्या मतदारसंघातील प्रकल्पाला सुप्रिमा दिली. त्यामुळे, मतदारसंघातील २० हजार एकर जमीन सिंचनाखाली येईल, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानायला जात आहे, असेही कडू यांनी म्हटले. 

राणा हा विषय नॉर्मल आहे, मी काही चौथ्या वर्गातील विद्यार्थी नाही. त्याने दिलगिरी व्यक्त केली, मीही आभार मानले, आता हा विषय संपल्याचे कडू यांनी म्हटले. त्यानंतर, राणा यांनी केलेल्या विधानासंदर्भात बोलताना, ते म्हणाले मी फूल घेऊन येतो, मी म्हणतो त्यांनी तलवार घेऊन यावे. ५ आणि ६ तारखेला मी घरीच आहे. त्यांनी कोणते कोणते तुकडे पाहिजे माझे, हात पाहिजे की पाय. माझं मुंडकं पाहिजे असेल तर तिथं कापावं मला, अशा शब्दात कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

काय म्हणाले होते रवी राणा?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीमुळे बच्चू कडू यांच्यासोबतचा वाद मिटला आहे. पण लक्षात घ्या, कुणी मला दम देत असेल तर रवी राणाने उद्धव ठाकरेंचाही दम खाल्ला नाही. बच्चू कडू काहीच नाही. जर कडू दम देत बोलत असेल तर कुठल्याही स्तरावर मी उत्तर देईन. तो ज्या स्तरावर बोलेल त्यावर उत्तर देईन. प्रेमाच्या भाषेपुढे रवी राणा एकदा नाही तर दहावेळा झुकेल. पण कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारायचीही हिंमत आहे असा इशारा आमदार रवी राणांनी दिला होता.  

त्याचसोबत मंत्री बनणं हा माझा अधिकार नाही. माझे नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा सन्मान ठेवत मी २ पाऊलं मागे आलो. दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यात कुणाचेही मन दुखायला नको म्हणून मी तो विषय तिथेच संपवला. पण वारंवार मला कुणी दम देत असेल मी रवी राणाला माफ करणार नाही म्हटलं. तुला कुणी सांगितले माफ करायला? तुझ्यात जेवढी हिंमत असेल तू कसा निवडून येतो पाहा. वेळ सांगेल बच्चू कडू पुन्हा आमदार निवडून येतो की नाही असंही रवी राणांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणा