शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अमरावती विभाग पदवीधरसाठी 'हे' दोन जिल्हे ठरणार ‘गेम चेंजर’

By गजानन चोपडे | Updated: January 10, 2023 10:51 IST

महाविकास आघाडीचे ठरेना : ‘प्रहार’ने जाहीर केली उमेदवारी

अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आ. अकोलावासी डॉ. रणजित पाटील तसे नशीबवान आहेत. गेली दोन टर्म त्यांना टक्कर देईल, असा पैलवानच निवडणुकीच्या आखाड्यात नव्हता तर यंदा २० दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली असताना महाविकास आघाडीचा उमेदवारच ठरला नसल्याने पाटील निश्चिंत दिसतात. असे असले तरी अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजप समर्थित पॅनलला बसलेला फटका, अमरावती आणि यवतमाळ जिल्हा या निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरू शकतो, हे सांगण्यास पुरेसा आहे.

पाच जिल्ह्यांतील या मतदारसंघात १ लाख ८५ हजार ९२५ नोंदणीकृत मतदारांची आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. पैकी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात मतदारांचा हा आकडा ९० हजारांच्या घरात आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही उमेदवाराला परवडणारे नाही. सिनेटच्या निवडणुकीत याची प्रचिती सर्वांना आलीच आहे.

चार महिन्यांपूर्वीच भाजपने डॉ. रणजित पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचाराचा नारळ फोडला. पाटलांनी स्वत:चा प्रचार सुरू करून मोर्चेबांधणीही केली. तिकडे काँग्रेसने या जागेसाठी पुढाकार घेतला असला तरी महाविकास आघाडीतील इतर दोन प्रमुख पक्षांसोबत अद्याप चर्चा झालेली नाही. सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अमरावतीत येऊन गेले. पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, उमेदवार देण्यावरून सुरू झालेली काथ्याकूट संपलेली नाही. म्हणून की काय, आपल्यालाच पक्षाची उमेदवारी मिळेल. या आशेवर काही इच्छुकांनी अपक्ष नामांकन दाखल केले आहे. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदा काँग्रेस पक्षाने मतदार नोंदणीत बऱ्यापैकी परिश्रम घेतले आहे.

महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्याच वाट्याला येईल, असा विश्वास बाळगत अकोल्याचे डॉ. सुधीर ढोणे बाशिंग बांधून आहेत. अमरावती शहरातही नोंदणी पेंडालच्या बॅनरवर झळकलेले पोस्टर डॉ. ढोणे यांची इच्छा दर्शवितात. तर अमरावतीचे माजी महापौर मिलिंद चिमोटे यांचेही नाव काँग्रेसकडून इच्छुकांच्या यादीत आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून किरण चौधरी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे इतर निवडणुकांप्रमाणे महाविकास आघाडी ऐनवेळी उमेदवार देत असेल तर ही बाब आपसूकच भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे.

मागील कार्यकाळात काय केले?

डॉ. रणजित पाटलांनी परवा गेल्या दोन टर्ममध्ये आपण काय केले, याचा पाढाच वाचला. मात्र, त्यांनी केलेली कामे ही पहिल्या टर्मची असून, दुसऱ्या टर्ममध्ये काय केले, शिवाय ज्यांच्या मतांवर आपण निवडून आलो, त्या पदवीधरांसाठी काय केले. या प्रश्नांवर मात्र, ते निरुत्तरित दिसले. म्हणायला अमरावतीत जनसंपर्क कार्यालय थाटण्यात आले. मात्र, कुणाशीही त्यांचा फारसा संपर्क होऊ शकला नाही. ही बाब पाटलांना अडचणीत आणू शकते. अमरावती विद्यापीठात कर्मचाऱ्यांच्या ४७४ मंजूर पदांपैकी २०० रिक्त आहेत, तर प्राध्यापकांच्या १२० मंजूर पदांपैकी ६० पदांचा गुंता अद्याप सुटलेला नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकAmravatiअमरावतीYavatmalयवतमाळ