शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Amravati: मचाणीखाली अस्वलीचा ठिय्या...मग झोपच पळाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 22:43 IST

Amravati News: बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही उपलब्ध करून देण्यात आली. परिवारासह २३ मेच्या रात्री ‘निसर्ग अनुभव’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पारस (जि. अकोला) येथून सेमाडोहला आलेल्या रिदम हिने २० मिनिटे अगदी मचानाखालीच अस्वलींचा थरार अनुभवला.

- मनीष तसरेअमरावती - बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही उपलब्ध करून देण्यात आली. परिवारासह २३ मेच्या रात्री ‘निसर्ग अनुभव’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पारस (जि. अकोला) येथून सेमाडोहला आलेल्या रिदम हिने २० मिनिटे अगदी मचानाखालीच अस्वलींचा थरार अनुभवला. जणू आपण दुसरा दिवस पाहू ताे की नाही, असेच तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २३ मे रोजी निसर्गानुभव उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत मचाण बुकिंगची सुविधा ‘मॅजिक मेळघाट डॉट इन’ या संकेतस्थळावर उपलब्ध होती. या निसर्गानुभव कार्यक्रमासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत १२८ मचाणी उपलब्ध होत्या. या मचाणीवरून बुद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या प्रकाशात निसर्ग सौंदर्यासोबतच विविध प्राणी पाहणे आणि त्याची मोजदाद करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, ढगाळ वातावरणामुळे यंदा अनेकांचा हिरमाेड झाला.

अस्वलीचा थरारपारस येथून आलेल्या चांडक परिवाराने वेगवेगळ्या मचाण बुक केल्या होत्या. सेमाडोह येथील संकुलातून चारच्या सुमारास सर्वांना मचाणवर सोडण्यात आले. मेळघाटातील वाघाचे दर्शन व्हावे, हीच इच्छा घेऊन सर्वच जण मेळघाटमध्ये येतात. रिदम पहिल्यांदाच मेळघाटात निसर्गानुभव घेण्यासाठी आली होती. जवळपास ५ वाजेच्या सुमारास मचाणवर पोहोचल्यावर गाइडच्या परवानगीशिवाय खाली उतरण्यास परवानगी नव्हती. रात्रीच्या सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जोरात आवाज आला. सुरुवातीला कळलेच नाही की तो आवाज नेमका कशाचा? आईसोबत असल्याने मी आईला जागवले. ती म्हणाली कुणीतरी प्राणी शिकारीसाठी आले आहे. त्यामुळे आम्ही गाइडला विचारले तर त्यांनी सांगितले की दोन अस्वली भांडत आहेत. काही वेळाने त्या निघून गेल्या. मात्र, पुन्हा पावणे दोनच्या सुमारास पुन्हा एक अस्वल आली आणि ती नेमकी अगदी मचाणच्या खाली बराच वेळ बसून राहली. त्यावेळी असे वाटत होत की ही जर वर चढली तर आपले काय होणार? त्या भीतीपोटी आम्ही जराही हालचाल करणे टाळले. अगदी त्या वेळेेला विचार आला हिने जर आमच्यावर हल्ला केला तर आपण उद्याचा दिवसच पाहणार नाही. मात्र काही वेळाने जोराने आवाज करून ती निघून गेली. जाताना पुन्हा वळून पाहिले आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला.

वाघ जरी दिसला नाही तरी निसर्गाचा अनुभव हा सुंदर होता. वन्यप्राण्यांकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्या शिकायला हव्यात असे निसर्गानुभव घेण्याकरिता आलेल्या प्राणीप्रेमींनी सांगितले. आमच्या जंगलात जसे प्लास्टिक कुठेच आढळत नाही. तसेच आपणसुध्दा शहरात प्लास्टिक टाळायला हवे, ही सुरुवात स्वत:पासून करायला हवी. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह क्षेत्रातून येणाऱ्या पर्यटकांना दुपारी तीनच्या सुमारास ठरवून देण्यात आलेल्या मचाणवर सोडण्यात आले. त्यासोबत त्यांना फूडपॅकसुध्दा देण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नवरे, प्रदीप बाळापुरे, वनरक्षक गुलाब धांडे, मंगेश घोंगळे, शुभम नेसनेसकर, राधिका पोहेकर, वनपाल बाबूराव खैरकार, अविनाश मते, संदीप लवगे, गाइड भोला मावस्कर यांनी व्यवस्था सांभाळली.

टॅग्स :Amravatiअमरावतीforestजंगलwildlifeवन्यजीव