कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. शासनाने गर्दीचे ठिकाण, सार्वजनिक स्थळे, माॅल, प्रतिष्ठाने बंद केली. तसेच माॅर्निंग वॉककरिता घराबाहेर पडणाऱ्यांवर निर्बंध घातले गेले. व्यायाशाळा बंद करण्यात आल्या. खुल्या मैदानावर प्रवेश बंदी केली. त्यामुळे हाताला काम नाही. शरीराला व्यायाम नाही. घरातच सुरक्षित रहा, असाच जीवनक्रम होऊन गेल्यामुळे अनेकांची जीवनशैली बदलल्याने जानेवारी २०२० च्या तुलनेत जानेवारी ते एप्रिल २०२१ दरम्यान १०२७२ रुग्णांना १०८ अँब्युलन्सने रुग्णालयात पोहचविल्याची माहिती डॉ. नरेंद्र अब्रुक यांनी दिली.
जिल्हा २०२० रुग्ण २०२१ टक्केवाढ
अकोला ५६ ६३ ११.१
अमरावती १७० १७४ २.३
बुलडाणा ४६ १७१ ७३.१
वाशीम ३२ ५२ ३८.६
यवतमाळ ८६ १०७ १९.६
एकूण ६७० ८४५ २८.२
--
विदर्भात २४५५५ रुग्णांना १०८ चा आधार
अकोला १२८४
अमरावती ३४६८
भंडारा १२२१
बुलडाणा १६८५
चंद्रपूर ४०१४
गडचिरोली १६०५
गोंदिया २२६६
नागपूर ४८३१
वर्धा १२३५
वाशिम १०१०
यवतमाळ २८२५
एकूण २४५५५
कोटजानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत सन २०२० च्या तुलनेत यंदा अर्धांगवायूचे २८.२ टक्के रुग्ण वाढले. त्यांना तातडीने रुग्णालयांत पोहचविण्यात आल्याने जीव वाचविता आले. काहींना अपंगत्वातून सावरण्यात आले.
डॉ. नरेंद्र अब्रुक,
जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र १०८ अँब्यूलंस