शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

अमरावतीकरांनो, विकास हवा असेल तर पाणी वाचवा!

By admin | Published: March 22, 2016 12:21 AM

राज्यात मागील काही वर्षांपासून पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळीस्थिती निर्माण होते.

जागतिक जलदिन : पाण्याचा अपव्यय ठरू शकतो घातक, अप्पर वर्धा धरण ठरले वरदानअमरावती : राज्यात मागील काही वर्षांपासून पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळीस्थिती निर्माण होते. अलिकडे पाणीटंचाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उन्हाळा आला की राज्यात पाणीटंचाईची भीषण तीव्रता जाणवू लागते. सुदैवाने अमरावती जिल्ह्यात मात्र पाणीटंचाईचे सावट नाही. परंतु अमरावतीकरांनी मुबलक उपलब्ध असलेल्या पाण्याचे महत्त्व वेळीच ओळखायला हवे. पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवून भविष्यात अमरावतीचा मराठवाडा होऊ नये, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. अमरावतीत नळाची तोटी उघडताच शुद्ध पाणी मिळते. परंतु जे सहज मिळते त्याची किंमत न करणे, हा मानवी स्वभावगुण आहे. ‘मिल गया तो मिट्टी है, खो गया तो सोना है’ या उक्तीप्रमाणे मुबलक उपलब्ध असलेल्या पाण्याचा गैरवापर होऊ देऊ नये. शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा होतो. शहरापासून ५५ किलोमिटर अंतरावरून सिंभोराधरणातून पाणी, शहरात पोहोचते. या धरणातील पाण्याचा साठा बहुदा त्यावर्षी पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतो. पाणी वितरणाची प्रक्रिया जरा समजून घेऊ या. धरणात साठविलेले पाणी पंपिंग स्टेशनमधून २२ किलोमिटर अंतरावरील नेरपिंगळाई येथील टेकडीवर पाईपलाइनद्वारे चढविले जाते. यासाठी ७५० हॉर्सपॉवरचे पाच पंप पंपिंग स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. नेरपिंगळाई येथे साठविलेले पाणी नंतर उतारामुळे (ग्रॅव्हिटीमार्फत) ३३ किलोमिटरचे अंतर पार करून शहरात आणले जाते. येथील जलशुद्धीकरण केंद्रात सात टप्प्यांमध्ये पाणी शुद्ध केले जाते. पश्चात त्या पाण्याचे वितरण होते. या प्रक्रियेचा महिन्याचा खर्च दोन कोटींच्या घरात आहे. कोणत्याही शहराचा विकास तेथील उद्योगधंद्यांवर अवलंबून असतो व उद्योग हे पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. त्यामुळेच विकासासाठी अमरावतीकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. गावाची, शहराची, राज्याची व देशाची प्रगती साधायची असल्यास आपल्याला पाण्याचे मोल समजावे लागेल व पाण्याचा वापर काटकसरीनेच करावा लागेल. पाणी बचतीचे छोटे-छोटे उपाय अंमलात आणल्यास आपण भीषण पाणीटंचाईवर मात करू शकतो.- संदीप ताटेवार स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती