शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
3
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
4
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
5
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
6
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
7
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
8
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
9
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
10
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
11
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
12
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
13
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
14
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
15
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
16
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
17
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
18
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
19
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
20
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

अमरावतीनेच घडविले, परतफेड करण्याची वेळ आता माझी!

By admin | Published: November 07, 2015 12:05 AM

अमरावतीच्या भूमीत मी घडलो. पालकमंत्रिपदापर्यंतची झेपही याच भूमीची देण. आता वेळ माझी आहे.

पालकमंत्री प्रवीण पोटे : भूषणावह शहरनिर्मितीचा संकल्प, गतिमान प्रशासनाचा प्रयोग जिल्ह्यात यशस्वीलोकमत मुलाखतअमरावती : अमरावतीच्या भूमीत मी घडलो. पालकमंत्रिपदापर्यंतची झेपही याच भूमीची देण. आता वेळ माझी आहे. विकासाच्या रुपाने शक्य ते सर्व अमरावतीला परत करायचे आहे. प्रत्येकाला भूषण वाटेल, असे शहर साकारण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली गेली आहेत... अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या बोलण्यातून मायभूच्या विकासाची तळमळ झिरपत होती. निमित्त होते 'लोकमत'शी बातचितीचे. पालकमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून अमरावती जिल्ह््यातील प्रशासनात कमालिचा बदल घडवून आणणारे ना.पोटे पाटील गतीमान व्यवस्थेवर भर देतात. सामान्य माणसांकडून आलेल्या अर्ज, तक्रारींवर निश्चित कालावधीत निर्णय व्हायलाच हवा, हा त्यांनी आखून दिलेला नियम आता येथील जिल्हा प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा अंग झाला आहे. या एका महत्त्वपूर्ण निर्णयाने प्रशासन दखलनीयरित्या गतीमान झाले आहे. या आदेशांनंतरही सामान्य दुर्लक्षित रहात असतील तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाशेजारीच असलेल्या ना. पोटे यांच्या कार्यालयातून प्रशासनाला जाब विचरणारी यंत्रणाही कार्यरत आहे. दिवा, लवाजमा, सुरक्षा ताफा यात रमण्याऐवजी जिल्हा विकासाच्या कल्पनेत रमणारे पालकमंत्री वेळ मिळेल तेव्हा, एकटेच ड्राईव्ह करीत शहराची भ्रमंती करतात. बरेचदा ते अधिकाऱ्यांना शहर दाखवितात. प्रसिद्धी माध्यमांना टाळून अवलंबल्या जाणाऱ्या या कार्यप्रणालीमागील उद्देश सांगताना ना.पोटे म्हणतात, कधिकाळी लहानगे शहर असलेली आपली अमरावती आता महानगर झाले. शहराचा स्वभाव, शहराच्या गरजा एक नागरिक म्हणून मला ठाऊक आहेत. शहराची शक्तीस्थळे आणि शहराच्या मर्यादांशी मी परीचित आहे. प्रशासनाचा क्षमतापूर्ण वापर करून घ्यावयाचा असेल तर विविध प्रशासकीय प्रमुखांना शहरातील उणे अधिक कळायला हवे. काय नेमके केले की विकास होईल, काय रोखले की लोकोपयोगिता वाढेल या बाबी एकदा का प्रशासनाला कळल्यात की निश्चित दिशा मिळते. या दिशानिश्चितीसाठीच मला हा प्रयोग महत्त्वपूर्ण वाटतोे. अमरावती शहराचा समावेश 'स्मार्ट सिटीं'च्या यादीत होणार की नाही याबाबत अमरावतीकरांना धाकधूक असतानाच ना.पोटे यांच्या ठोस प्रयत्नांनी शहराचा स्मार्ट यादीत समावेश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन याकामी महत्त्वूपर्ण ठरल्याचे ना.पोटे आवर्जून सांगतात. या दोन नेतृत्त्वांमुळेच शहर विकासाच्या कल्पना प्रत्यक्षात साकारतील असा विश्वास ना. पोटे यांना आहे. स्मार्ट सिटी निर्मितीच्या अनुशंगाने दिल्लीहून आलेल्या विशेष अधिकाऱ्यांच्या चमुसोबत ना.पोटे यांनी स्वत: शहरभर दौरा करून रस्ते, मल्टिप्लेक्स पार्किंग कुठे व्हावेत याबाबत मार्गदर्शन केले. विकासकार्यातील त्यांचा हा सक्रीय सहभाग दखलनीय ठरला आहे. शहराचा कायापालट करण्यासाठीची पायाभूत व्यवस्था तयार करण्याच्या दिशेने शासन-प्रशासन स्तरावर अधिकृत सुरुवात झाली आहे. तिनेक वर्षांत त्याचे प्रत्यंतर येईलच, असा विश्वास ना.पोटे यांनी व्यक्त केला. 'स्मार्ट सिटी' निर्मितीसाठी आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमांना फळ आले. आता प्रत्यक्ष शहर साकारण्याचा टप्पा पुढ्यात आला आहे. त्यासाठी जसा सर्वपक्षीय तसाच तमाम जनतेचा सक्रीय सहभागही व्हावा, अशीच एकंदर व्यवस्था उभारण्याकडे ना.पोटे यांनी कटाक्ष ठेवला आहे. रस्ते, पूल, उडाणपूल, पार्किंग मल्टिप्लेक्स, उद्योग, वीज, पाणी यासंबंधिच्या सर्वांगिण मुद्यांवर लक्ष केंद्रीत केलेले असतानाच नव्या पिढीच्या बुद्धीमत्तेला पोषक वातावरण उपलब्ध व्हावे यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे ना. पोटे म्हणाले. जगाला गवसणी घालावी अशी तल्लख बुद्धीमत्ता अमरावती, विदर्भातील मुलांमध्ये असल्याचा विश्वास ना.पोटे नेहमीच व्यक्त करतात.