शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विभागीय आयुक्तांशी तासभर चर्चा; तरीही पांढरी खानमपूर प्रकरणात तोडगा नाहीच

By उज्वल भालेकर | Updated: March 7, 2024 22:20 IST

प्रवेशद्वाराचे काम सुरू करा, नंतरच गावी परतणार; बौद्ध समाजबांधव निर्णयावर ठाम

अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील गाव सोडलेले शेकडो बौद्धबांधव गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकले. यावेळी विभागीय आयुक्तांशी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी तासभर चर्चा झाली; परंतु या चर्चेमध्ये कोणतीही ठोस निर्णय न झाल्याने अखेर विभागीय आयुक्त कार्यालयावरच बौद्ध समाजबांधवांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

पांढरी खानमपूर येथील गावातील मुख्य प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून दोन समाजामध्ये वाद सुरू झाला आहे. मागील महिन्याभरापासून हा वाद पेटला असून ६ मार्चला बौद्ध समाजबांधवांनी प्रवेशद्वाराच्या मागणीसाठी आपल्या मुला-बाळांसह तसेच गुरे-ढोरांना सोबत घेत गाव सोडले. गुरुवारी हे सर्व बौद्धबांधवांनी अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी गावातील काही ग्रामपंचायत सदस्य, डॉ. कमल गवई तसेच इतर प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांशी तासभर चर्चा केली. परंतु त्यानंतरही कोणताही ठोस मार्ग न निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत प्रवेशद्वाराच्या बांधकामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत गावी पुन्हा परतणार नसल्याच्या भूमिकेवर बौद्ध समाजबांधव ठाम राहतील, असा निर्णय घेतला.आयुक्तांनी मागितला तीन दिवसांचा अवधीविभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी गावातील नागरिकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर तीन दिवस आलेल्या शासकीय सुट्ट्यांमुळे सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देत तो पर्यंत पुन्हा गावात परतण्याची विनंती केली. गावांमध्ये पूर्ण संरक्षण आणि तसेच संबधित ॲट्रॉसिटी दाखल असलेला आरोपी कमलेश पटेल व इतर १८ जणांना अटक करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. परंतु बौद्धबांधव प्रवेशद्वाराचे कामाला जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत पुन्हा गावात न परतण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने ठोस निर्णय झाला नाही.

टॅग्स :Amravatiअमरावती