शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

वीज पारेषण कंपनीची मनमानी

By admin | Published: May 06, 2016 12:09 AM

सततची नापिकी, दुष्काळाचे सावट, कर्जाचा डोंगर यामुळे वैतागलेला शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे.

ग्रामस्थ त्रस्त : कंत्राटदारांचा सुलतानी कारभारयेवदा : सततची नापिकी, दुष्काळाचे सावट, कर्जाचा डोंगर यामुळे वैतागलेला शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे. त्यात वीज मंडळाच्या तुघलकी कारभाराची आणखी भर पडली आहे. शेतकऱ्यांसाठी वीज जोडणीचा कार्यक्रम सुरू आहे. शेतकऱ्यांना वीज मिळालीच पाहिजे. पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून विद्युत वाहिनी जाते, त्यांना पूर्वसूचना द्यायला हवी. विजेच्या आराखड्याची माहिती दिली जावी. शेतीची मशागत योग्य तऱ्हेने करता यावी, यासाठी शेतकऱ्यांचे मत विचारात घेऊन आखणी केली तर हे काम अधिक योग्य पद्धतीने होऊ शकते. परंतु मुजोर ठेकेदार वरिष्ठांचे आदेश झुगारून मनमानी करीत आहेत. येवदा भाग नं. १ मधील गट क्र. १७० या शेतातून जुनी ११ के.व्ही. लाईन गेली आहे. त्याच शेतात नवीन ११ के. व्ही. लाईन टाकण्यात आली. तसेच एल. टी. लाईन आणि डी. पी. सुद्धा याच शेतामध्ये टाकण्यात आली. वाहतुकीच्या रस्त्यावर विजेचा खांब रोवण्यात आला. जवळपास ४० खांबाचे जाळे एकाच शेतात तयार झाले. विजेच्या खांबामुळे मशागतीला अडचण निर्माण झाला. शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी दिलीप डवरे यांनी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, सहायक अभियंता यांच्याकडे रितसर तक्रार केली आहे. अजूनही या प्रकरणावर कार्यवाही झाली नाही. तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांवर अस्मानी, सुल्तानी संकट कायममागील तीन वर्षांपासून अल्प पावसामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांवर वीज महापारेषण कंपनीने अडथळा आणल्याने ते आणखीनच डबघाईस येत असल्याचे चित्र आहे. शासनाने ठोस निर्णय घेण्याची मागणी आहे.