शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

मार्च एंडिंगला जिल्हा परिषदेच्या तिजोरीत पडली २५० कोटींची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:49 IST

Amravati : विविध योजनांसाठी राज्य शासनाकडून निधी प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :जिल्हा परिषदेची आर्थिक तिजोरी सांभाळणाऱ्या वित्त विभागाला राज्य शासनाकडून ३१ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विविध विभागांची विकास कामे व योजनासाठी विविध विभागांसाठी सुमारे २५० कोटी रुपयांच्या निधीची भर मार्च एंडिंगच्या शेवटच्या दिवशी तिजोरीत पडली आहे. 

शासकीय आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपुष्टात आले आहे. या दिवशी जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून व जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर केलेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील अप्राप्त निधीची रक्कम प्राप्त झाली आहे. ३१ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या ११ विभागांसाठी तिजोरीत २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. एप्रिल महिन्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होते. त्यामुळे मार्चअखेर हिशेबाची जुळवाजुळव शासकीय विभागात गत आठवडधात सुरू होती. ३१ मार्चपूर्वी निधीचा विनियोग शासनाकडे सादर करावा लागतो. वर्षभरात शासनाकडून जिल्हा परिषदेला विविध योजनांसाठी प्राप्त झालेल्या योजनांच्या व विकास कामांचा निधी संदर्भातील संपूर्ण लेखाजोखा मार्च एंडिंगला बंद करण्यात येतो. त्यानुसार आर्थिक वर्षांच्या ताळेबंदाची जुळवणी पूर्ण होऊन शासनाकडून प्राप्त व अप्राप्त निधी लेखाजोखा लक्षात घेऊन शासनाकडून आर्थिक वर्षाच्या प्राप्त असलेला निधी बीडीएसवर राज्याच्या वित विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येतो. त्यानुसार ३१ मार्च रोगी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना आर्थिक वर्षात द्यावयाचा निधी मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी शासनाने उपलब्ध करून दिल्याने विकासकामांचा मार्ग सुकर झाला आहे. 

१०६ कोटीजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे १०६ कोटी ६१ लाख २९ हजार ३७१ रुपयांचा निधी मिळाला आहे. यामध्ये क वर्ग यात्रा १० कोटी २६ लाख, जिल्हास्तरीय रस्ते मजबुतीकरण २० कोटी ५१ लाख ५० हजार, ग्रामीण रस्ते योजना १९ कोटी २१ लाख ४० हजार जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत ३ कोटी, बर्ग तीर्थक्षेत्र ३३ कोटी १७ लाख ४१ हजार, आदिवासी घटक रस्ते सुधारणा ५१ लाख ८२ हजार ८००, अतिवृष्टी पुरहानी १ कोटी ४५ लाख ७३ हजार, असे एकूण १०६ कोटी ६१ लाख २९ हजार ७३१ रुपयांचा निधी मिळाला. 

३४ कोटीदलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांतील दलित वस्त्यांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार कामे मंजूर केली आहे. त्यानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील या कामासाठी ३१ मार्च रोजी शासनाकडून सुमारे २७ कोटी ८ लाख रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय महिला व बालकल्याण विभागाना सहा कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

१३ कोटीजिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सुमारे १३ कोटी रुपयांचा निधी आविता वर्षाच्या शेवटच्या दिवशी शासनाकडून उपलब्ध करून दिला आहे. हा निधी पाणीपुरवठा योजनासाठी प्राप्त झाल्याचे कार्यकारी अभियंता सुनील जाथत यांनी सांगितले. 

या विभागांना मिळाला निधी मार्च एंडिंगला जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने जिल्ह्या कोषागार कार्यालयात मागण्यांची देयके सादर केली होती. त्यानुसार शासनाने जिल्हा परिषद बांधकाम, समाज कल्याण, शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य, पशुसंवर्धन, पंचायत, महिला व बालकल्याण आणि सामान्य प्रशासन आदी विभागाला शासनाकडून जवळपास २५० कोटी रुपयांचा निधी ३१ मार्च रोजी मिळाल्याचे कैफो' डॉ. हेमंत ठाकरे यांनी सांगितले

टॅग्स :Amravatiअमरावतीzpजिल्हा परिषद