शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

लेकरासह ‘ती’चा रेल्वेसमोर झोकून देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:10 AM

अमरावती : वार गुरुवार. वेळ सायंकाळी ७ च्या सुमाराची. स्थळ अमरावतीस्थित रेल्वेस्थानकावरील उड्डाणपूल. ती लेकरासह रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देण्याच्या ...

अमरावती : वार गुरुवार. वेळ सायंकाळी ७ च्या सुमाराची. स्थळ अमरावतीस्थित रेल्वेस्थानकावरील उड्डाणपूल. ती लेकरासह रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देण्याच्या मानसिकतेत. ती जशी उडी घेणार, तसेच तिला तिचे लेकरू बिलगले. अजाणत्या वयातही त्याला संकटाची जाणीव झाली की काय, मात्र, ते मायला घट्ट बिलगले. त्याचवेळी वरून रेल्वेचा नजारा पाहणाऱ्यांच्याही ही बाब लक्षात आली. त्यांनी तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. सुमारे अर्धा तास या कल्लोळात निघून गेला. त्या लेकराच्या रुदनाने व उपस्थितांच्या माणुसकीमुळे तिचे प्राण वाचले. त्याचे झाले असे, की गुरुवार, १ जुलै रोजी ६५ दिवसांच्या खंडानंतर अमरावती मुंबई ही ‘अंबा एक्सप्रेस’ सुटणार असल्याने अमरावती रेल्वे स्थानकांवर मोठी रेलचेल होती. अनेक दिवसांनंतर ही गाडी सुटत असल्याने बघ्यांनीदेखील गर्दी केली होती. प्रवाशांची ये-जा सुरू असताना उपस्थितांनी एकच गलका केला. ‘वाचवा, धावा, रेल्वे थांबवा, चेन ओढा, असा कल्लोळ झाला.

रेल्वे पुलावरून एक तिशीतील महिला उडी घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे लक्षात आले. त्या महिलेसोबत तिचे अदमासे ५ वर्षांचे लेकरूदेखील होते. ती उडी घेण्याच्या प्रयत्नात असताना तो तिला घट्ट बिलगला. पुलावरील लोकदेखील तिला थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. गस्तीवर असलेले पोलीसदेखील पोहोचले. त्यांनी त्या महिलेची समजूत काढली. महत्प्रयासानंतर तिने उडी घेण्याचा निर्णय मागे घेतला. अन्‌ सर्वांचा जीव भांड्यात पडला.

हद्द कुणाची?

या घटनेबाबत शहर कोतवाली पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला नाही. अशी कुठलीही घटना आपल्या हद्दीत घडली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर, त्या महिलेने उडी घेतली असती, तर ते प्रकरण रेल्वे पोलिसांच्या अखत्यारित आले असते, असे रेल्वे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे हद्द कुणाची, हा प्रश्न निर्माण झाला.