शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

विधानसभेच्या पूर्वी राज्यात ओबीसी, मराठा असे दोन तट

By उज्वल भालेकर | Published: August 05, 2024 2:50 PM

प्रकाश आंबेडकर : ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी १०० आमदार हवेत

उज्वल भालेकर

अमरावती : विधानसभेच्या निवडणूकीच्या आगोदर मराठा आणि ओबीसी असे दोन तट पडले आहेत. हे राजकीय भांडण निवडणूकीपर्यंत चालेल, असे मी यापूर्वी म्हणालो होतो. ओबीसी मराठ्यांना मतदान करणार नाही आणि मराठे ओबीसींना मतदान करणार नाहीत. आपले आरक्षण जातेय ही जाणीव ओबीसींना झाली आहे. जर ओबीसी आरक्षण टिकवायचे असेल तर विधानसभेत शंभर ओबीसी आमदार पाठविण्याची तयारी आम्ही करत असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीत सोमवारी व्यक्त केले. तसेच दोन तट असले तरी हे आपले राजकीय भांडण असल्याची भूमिका असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.

ओबीसी जागर यात्रेच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर हे अमरावतीमध्ये आहेत, यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आंबेडकर म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांना कणा नाही, त्यांना कणा असता, तर ते झूकले नसते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची तुलना केली, तर एकनाथ शिंदे यांची कामगिरी सरस आहे. याचा सरळसरळ अर्थ असा आहे, की जी शिवसेनेची मते आहेत, ती एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आणि शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाच खरी शिवसेना मानत आहे. तर सध्या राज्यात जे मराठा, ओबीसी असे दोन तट पडले आहेत याला मनोज जरांगेंची जी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी आहे, त्यामुळे दोन तट पडले आहेत. राजकीय भांडणाचे सामाजिक भांडणात रुपांतर करण्याचे अनेकांचे मनसुबे ओबीसी आरक्षणाच्या यात्रेतून उध्वस्त झाले असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या नंतर सरकार ओबीसींची जात निहाय जनगणना मान्य करून घेईल. तसेच जात जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तो पर्यंत ओबीसी आरक्षणावर स्थगिती दिली जाईल. असा निर्णय घेतला जाईल, असे अनेक जण सांगत आहेत. त्यामुळे आम्ही किमान १०० ओबीसी आमदार निवडून आणू असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज ठाकरे यांच्यावर ताडा कायद्याअंतर्गत कारवाई करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात वाढत असलेल्या लोकसंख्येवर भाष्य केलं आहे. यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांना सरकारने मागे पुढे न बघता आतमध्ये टाकलं पाहिजे असे म्हणत खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रातील माणूस हा देशाच्या वेगवेगळ्या राज्यात राहतो गुजरात मध्येही राहतो त्यांचे काय करायचे त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभंगण्याचे वक्तव्य आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यूएपीए आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीOBCअन्य मागासवर्गीय जातीMaratha Reservationमराठा आरक्षणAmravatiअमरावती