शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एसटी कर्मचाऱ्यांचं हे वागणं बरं नव्हं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी आजवर अडचणीचा सामना करून कर्तव्य बजावले आहे. त्यांना कमी वेतनात संसार करणे  जिकरीचे जात आहे. हे सर्वानाच मान्य आहे. त्यामुळे संप करणे काहीच गैर नाही. मात्र, या संपाची शासनाने दखल घेतलेली आहे. त्यांनी वेतनवाढीचा प्रस्ताव देऊन वाढ केली. वेळेवर वेतन करण्याची हमी घेतली आहे. तरी संप मागे घेण्यात आलेला नाही. यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गत ५८ दिवसांपासून संप पुकारला आहे. राज्य शासनाने  विविध टप्प्यात वेतनवाढ जाहीर केली. दरमहा दहा तारखेच्या आत वेतन करण्याबाबत हमी घेतली आहे. तरीही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं हे वागणं बरे नव्हे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आजवर अडचणीचा सामना करून कर्तव्य बजावले आहे. त्यांना कमी वेतनात संसार करणे  जिकरीचे जात आहे. हे सर्वानाच मान्य आहे. त्यामुळे संप करणे काहीच गैर नाही. मात्र, या संपाची शासनाने दखल घेतलेली आहे. त्यांनी वेतनवाढीचा प्रस्ताव देऊन वाढ केली. वेळेवर वेतन करण्याची हमी घेतली आहे. तरी संप मागे घेण्यात आलेला नाही. यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संप कोठे तरी मिटविणे गरजेचे आहे.

दिवसभरात २२८७ जणांचा एस.टी.ने प्रवास-  अमरावती विभागातील आठपैकी तीन  आगारांमधून बुधवारी काही एसटी बस सोडण्यात आल्या. या माध्यमातून २२८७ जणांनी प्रवास केला. - अमरावती  विभागातील  अमरावती, मोर्शी, वरूड या तीन आगारातून बुधवारी १६ बस सोडण्यात आल्यात. मात्र, इतर आगारातून एकही बस सुटलेली नाही.

शासन सेवेत घेतल्याशिवाय माघार नाहीअतिशय तोकड्या पगारावर काम करून सेवा दिली आहे. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा लढा हा हक्कासाठी सुरू आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण होणार नाही, तोपर्यंत लढा चालूच राहील.- सतीश कडू, एसटी कर्मचारी

प्रवासी आमचे दैवत समजून सेवा केली आहे. ज्येष्ठापासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत प्रामाणिक सेवा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करून आमचा विश्वास सार्थ करावा व न्याय द्यावा. - श्रीकांत रोहनकर, वाहक 

आतापर्यंत २७० निलंबित

संपात सहभागी झालेल्या अमरावती विभागातील २७० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय सहा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. ११६ जण बडतर्फ केले आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप