शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पराकोटीच्या दारिद्र्यात जगतोय भोई समाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 13:46 IST

एससी, एसटीच्या सवलती मिळणार कधी? नदीपात्रातच जाते आयुष्य

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : गरीब, सालस व प्रामाणिकपणे मासे पकडण्याचे काम करणारा भोई समाज पराकोटीच्या दारिद्र्यात जगत आहे. नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी संपूर्ण आयुष्य जात असताना उद्याच्या पिढीला अनूसुचित जाती-जमातीच्या सवलती मिळणार कधी, असा प्रश्न या समाजबांधवांनी उपस्थित केला आहे.

बारा बलुतेदारांनंतर अठरा अलुतेदारातील महत्त्वाचा घटक म्हणजे भोई समाज आहे. या समाजाला इतिहास मोठा आहे. पूर्वीच्या काळी मंदिर, राजवाड्यांमध्ये पालखी वाहण्याचा मान भोई समाजाला होता. आजही अनेक राज्यात मंदिरातील पालखी भोई समाजबांधवांचा हात लागल्याशिवाय पुढे जात नाही. वेदकाळ, रामायण, महाभारतातील काळ, मध्ययुगीन काळ, शिवकाळाप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकपयोगी समाज म्हणून यांच्याकडे पाहिले गेले. भोई जमात सांस्कृतिकदृष्ट्या आदिवासी असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यांना ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश राज्यात अनुसूचित जमातीच्या सवलती मिळतात, तर महाराष्ट्रात नोकरी, शिक्षण क्षेत्रात टिकाव न लागणाऱ्या विमुक्त भटक्या जमातीच्या सवलती दिल्या जातात.

१९४७ नंतर भटक्या विमुक्त जमातीच्या सवलती भोई समाजाला मिळाल्या हे जेवढे सत्य आहे, तेवढेच या सवलतीचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत झिरपला नाही, ही बाबसुद्धा तेवढीच सत्य आहे.

जाळे विणण्याचे कामही बंदभोई समाजातील व्यक्ती पूर्वी कापसापासून सूत करून त्यापासून मासळीचे जाळे विणण्याचे काम करीत असत. जाळ्यामाधून पकडलेले मासे ताजे राहावे, यासाठी बांबूपासून तयार केलेली घुटी पाठीवर ठेवून त्यात मासे ठेवले जात होते. कालांतराने नायलॉनचे रेडीमेड जाळे उपलब्ध झाल्याने जाळे विणण्याचे कामही बंद पडले आहे. तथापि, या जाळ्यांचा भाव अधिक असल्याने अनेकांना व्याजाने पैसे घ्यावे लागतात.

पारंपरिक व्यवसाय संकटातभोई समाजाचा मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय आता संकटात आला आहे. कमी पर्जन्यमानामुळे नदी-नाले, तलावाच्या पाण्याची पातळी पूर्णतः घटली आहे. अनेक तलाव कोरडे पडले आहेत.

बेरोजगारांची वाढली संख्याभोई समाजबांधवांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे. बेरोजगारांची संख्याही जास्त आहे त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी मत्स्यव्यवसाय संस्थेची निर्मिती करण्यात आली परंतु, तलाव कोरडे होत असल्याने त्या कुचकामी ठरल्या आहेत. एकीकडे माशाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे, दुसरीकडे या व्यवसायात कंत्राटदार मोठ्या प्रमाणात शिरल्याने या समाजावर उपासमारीची पाळी आली आहे.

शासनाने समाजाला मोफत जाळे द्यावे. अनुदानात वाढ करावी. नवीन वर्षांसाठी मत्स्यबीज अनुदान तत्त्वावर मिळावे. घरकुल योजनेचा लाभ मिळावा. बीपीएलच्या यादीत समावेश व्हावा आदी मागण्या समाजाच्या शासनदरबारी धूळखातपडल्या आहेत. किसन सूर्यवंशी, विदर्भ मुख्य संघटक, भोई समाज,

टॅग्स :Amravatiअमरावती