शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मेळघाटात वर्गणीच्या पैशातून येतात मृतदेह ! अमरावती, नागपूर येथून मृतदेह आणण्यासाठी करावी लागते वर्गणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:24 IST

Amravati : कुपोषणाने मेळघाट गलितगात्र झाला असताना आरोग्य सुविधादेखील कागदोपत्रीच आहेत.

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटात आजारी रुग्णाला नशिबाने उपचार मिळाला, तरी देव पावला. रेफर झाल्यावर मृत्यू झाला, तर भीक मागितल्याशिवाय पुढील क्रियेसाठी परिवारापुढे पर्याय नाही. एक-दोन नव्हे दशके नव्हे, तर स्वातंत्र्यानंतरही मेळघाटातील आदिवासींच्या नशिबी सुरू असलेला हा खेळ अविरत सुरू आहे. अचलपूर, अमरावती, नागपूर येथून मृतदेह आणण्यासाठी वर्गणीच करावी लागत असल्याचे वास्तव व तेवढेच विदारक चित्र आहे. सरकार मेळघाटसाठी कोट्यवधीचा खर्च करते; परंतु मेल्यावर काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मेळघाटातील आदिवासी रुग्ण अचलपूर, नागपूर, अमरावती येथे रेफर केले जातात. नेताना वाटेत किंवा उपचारासाठी नेलेल्या ठिकाणी मरण पावल्यास मृतदेह चक्क भीक मागून आणावा लागतो. राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांना अनेक फोन नातेवाईक करतात आणि त्यानंतर वर्गणी गोळा केली जाते. 

आमदारांची मागणीधारणी व चिखलदरा तालुक्यासाठी दोन शववाहिका आणि दोन रुग्णवाहिका देण्याची मागणी आमदार केवलराम काळे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदनाद्वारे केली. त्यांनी आश्वासन देत मान्यही केले.

रुग्णवाहिकेत मृतदेह ? नको बाबारुग्णवाहिकेत केवळ आजारी रुग्णांनाच नेण्याचा आरोग्य विभागाचा नियम आहे. मृतदेह शववाहिकेने नेला जातो, परंतु आरोग्य विभागाकडे ती नाहीच. अलीकडे मोथा, दाबिदा हतरू, गौरखेडा कुंभी, राणा मालूर अशा विविध गावांत मृतांना पोहोचविण्यासाठी स्वतः व जवळच्या मित्रांकडून आठ ते दहा हजार रुपये वर्गणी केल्याचे खोज संस्थेचे बंड्या साने यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

"आरोग्यमंत्र्यांनी धारणी व चिखलदरा तालुक्यांसाठी दोन शववाहिका व दोन रुग्णवाहिका देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्यातून आदिवासींना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही."- केवलराम काळे, आमदार मेळघाट

 

टॅग्स :MelghatमेळघाटAmravatiअमरावती