शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

बस प्रवाश्यांना करावा लागतो टपावरून जीवघेणा प्रवास; पालकमंत्र्यांना ३० बसगाड्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:00 IST

३० बसगाड्या द्या, पालकमंत्र्यांना पत्र : अनेक पाड्यांमध्ये बस नाहीच

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यांत अतिदुर्गम आदिवासी पाडे तर सोडाच, अगदी रस्त्यावरील गावांमध्येसुद्धा बस जात नसल्याचे वास्तव आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही आदिवासींना खासगी वाहनांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यादरम्यान धारणी व चिखलदरा तालुक्यासाठी मानव विकास संसाधन मंत्रालयामार्फत ३० बसगाड्या देण्याची मागणी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एक निवेदनाद्वारे केली.

भंगार बसचे आगार म्हणून कुख्यात परतवाडा आगारात पाच बस नव्याने दाखल झाल्या. परंतु, मेळघाटच्या नशिबी नादुरुस्त व भंगार गाड्याच आहेत. अपघात घडले तरी आदिवासींच्या नशिबी आजही त्या भंगार बस किंवा अवैध प्रवासी वाहनाच्या टपावर, कोंबून प्रवास करावा लागत आहे. मेळघाटच्या नावावर अनेक सुविधा शासन देत असले तरी त्यात मूलभूत सुविधा बेपत्ता असल्याचे चित्र अत्यंत क्लेशदायक आहे.

३०० खेडी आणि बारा बस. धारणी व चिखलदरा तालुक्यात दुर्गम-अतिदुर्गम मिळून जवळपास ३०० आदिवासी पाडे आहेत. मेळघाटात केवळ १२ ते १५ बस आहेत.

धारणी आगार केव्हा?चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व मेळघाटातील धारणी येथे बस आगार याच सरकारने गतवर्षी मंजूर केले. प्रत्यक्ष कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही.

३० बसची मागणीधारणी व चिखलदरा तालुक्यांत आदिवासींना प्रवास सुविधेसाठी पहिल्या टप्प्यात किमान ३० बसगाड्या देण्याची मागणी आ. केवलराम काळे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनातून केली आहे.

फाट्यावर सोडून जाते बसआजही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये बस प्रत्यक्ष जात नाही. दीडशेपेक्षा अधिक गावांच्या फाट्यावर बस प्रवाशाला सोडून जाते. तेथून दिवसा व रात्रीही पायी गाव गाठावे लागते.

"आदिवासी पाड्यांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सामान्य नागरिकांना आणि प्रवासासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. नवीन बसगाड्यांतून काही प्रमाणात अडचणी दूर होतील."- केवलराम काळे, आमदार, मेळघाट

टॅग्स :AmravatiअमरावतीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे