शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

हवामानानुसार पीक पद्धती बदला

By admin | Published: June 28, 2017 12:29 AM

जून ते आॅक्टोबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीतील खरीप हंगाम निर्भर असतो.

खरिपाला सुरूवात : कोरडवाहू शेतीत आंतरपीक महत्त्वाचेलोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : जून ते आॅक्टोबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीतील खरीप हंगाम निर्भर असतो. मात्र मागील पाच वर्षांचा आढावा घेता पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हवामान बदलत असताना पीक पद्धतीही बदलणे गरजेचे आहे. पिकांच्या उत्पादकतेत स्थिरता आणण्यासाठी आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे.दरवर्षी पावसाची अनिश्चितता कायम आहे. कधी अधिक पाऊस, तर कधी पावसात खंड यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. कमी पावसाच्या भागात प्रामुख्याने हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत कमी कालावधीची पिके घेणे व वाणांची निवड करणे आवश्यक आहे. मूग, उडीद व जमिनीवर पसरून कमी उंचीची पिके व जमिनीची धूप थांबविण्यासाठी मूग, उडीद व सोयाबीन या पिकांचा आंतरपीक म्हणून अवलंब करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढून सूक्ष्म जिवांच्या संख्येत वाढ होते. मुख्य पीक व आंतरपीक यांची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या स्तरात वाढणारी असावीत. कपाशीची मुळे जमिनीच्या खालच्या स्तरातून अन्नद्रव्य शोषून घेतात. आंतरपीक म्हणून मूग व उडीद पिकांची मुळे जमिनीच्या वरच्या स्तरातून पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेतात. मुख्य पीक व आंतरपिके एकमेकांना पूरक अशी अधिक उत्पादन देणारी निवडावी. अधिक अन्नद्रव्यांची गरज असणाऱ्या पिकांचा आंतरपीकातील समावेश टाळावा.हवामानात होणारा बदल शेती पिकावर विपरीत परिणाम करतो. पावसाचा खंड व दररोज वाढणारे तापमान बिजांकुरावर व रोपांवर परिणाम करतात. यासाठी पावसाचे व्यवस्थापन व आंतरपीक पद्धतीच्या पिकांसाठी नत्राचा योग्य वापर करणे शेतकऱ्यांसाठी काळाची गरज ठरत आहे.सोयाबीनमध्ये हवे तुरीचे आंतरपीक जिल्ह्यात सर्वाधिक पेरणीक्षेत्र सोयाबीनचे आहे. कोरडवाहू क्षेत्रात जिथे कमी अधिक पाऊस पडतो, अशा क्षेत्रात सोयाबीनसोबत तुरीचे आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे. सोयाबीनच्या दोन, चार ओळीनंतर तुरीची ओळ पेरावी. यामुळे तुरीची वाढ झाल्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत कीटकनाशकांची फवारणी करणे सोईचे होते. ही पेरणी जुलैच्या १५ तारखेपर्यंत करता येईल. आंतरपीक पद्धतीचे व्यवस्थापन महत्त्वाचेमध्यम किंवा भारी जमिनीत कपाशी, तूर, ज्वारी, सोयाबीन आदी पिके घ्यावीत. तसेच लवकरच पसरणाऱ्या नत्राची निवड करावी. दोन ओळीमध्ये योग्य अंतर ठेवून हेक्टरी रोपांची व झाडांची संख्या योग्य ठेवावी. पेरणीमध्ये रूंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केल्यास पावसाच्या पाण्याचे संवर्धन योग्यरितीने करता येते.आंतरपीक पद्धतीचे फायदेसरासरीपेक्षा कमी अधिक पाऊस झाला तरीही आंतरपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी राहते.पट्टापेर पद्धतीत एक पीक तृणधान्य व एक पीक कडधान्य घेतल्यास जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.कडधान्य वर्गातील मूग, उडीद, तूर किंवा सोयाबीन पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास त्या पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये असणारे जिवाणू वातावरणातील नत्र शोषून जमिनीतून पिकांसाठी उपलब्ध करून देतात. या पिकांची पानगळ व अवशेष यामुळे जमिनीची सुपिकता व सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.कपाशी अधिक मूग आंतरपीक हवेकापूस अधिक मूग व उडीद यासारखी आंतरपिके घेता येतात.कपाशीच्या बीटी वाणासाठी ९० बाय ६० सेमी. आणि ९० बाय ९० अंतरावर शिफारस करण्यात आली आहे. कापसाच्या दोन ओळीमध्ये टोकन करून उडीद किंवा मुगाचे आंतरपीक घेता येते.कपाशीत तुरीचे आंतरपीक नकोकापसाच्या ६ ते ८ ओळीनंतर तुरीच्या दोन ओळी पेराव्यात. वास्तविकत: कपाशी व तूर दोन्ही ऊंच वाढणारी, विस्तारणारी आणि दीर्घ (१६० ते १८० दिवस) अवधीची पिके असल्याने तसेच सूर्यप्रकाश, ओलावा व अन्नद्रव्यांच्या गरजा समान असल्याने ही पिके एकमेकास स्पर्धक ठरतात.