शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
2
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
3
लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?
4
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
5
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
6
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
7
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
8
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार
9
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
10
Share Market : शेअर बाजार सपोर्ट लेव्हलवर, दिवाळीपूर्वी होऊ शकते घसरण; अपर लेव्हलवर सेलर्स सक्रिय
11
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
12
Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
13
१७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड
14
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
15
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?
16
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
17
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
18
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
19
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
20
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई

पालकमंत्र्यांच्या पत्राच्या आधारावर फसवणूक

By admin | Published: September 12, 2015 12:17 AM

तालुक्यातील लोकांची फसवेगिरी करणाऱ्या तीन आरोपींपैकी स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणाऱ्याने जिल्हा पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य ...

मोर्शी तालुक्यात गोरखधंदा : म्हणतात, जिल्हा उद्योग केंद्रातून कर्ज देतोलोकमत विशेषरोहितप्रसाद तिवारी ल्ल मोर्शीतालुक्यातील लोकांची फसवेगिरी करणाऱ्या तीन आरोपींपैकी स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणाऱ्याने जिल्हा पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांचे पत्र घेऊन जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांवर दडपण आणले. या पत्राच्या आधारावर आरोपी आणखी लोकांची फसवणूक करणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.मोर्शी तालुक्यातील लोकांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज मिळवून देण्याच्या, शासकीय जमिनी प्राप्त करून देण्यांच्या आणि इतर शासकीय लाभ प्राप्त करून देण्याच्या नावावर लोकांकडून हजारो रुपये उकळून फसवेगिरी करण्याचा प्रकार कथितरीत्या स्वत:ची ओळख पत्रकार म्हणून करवून देणाऱ्या वाघमारे, जिप शिक्षिका शीला धांडे आणि सारिका पेठे या तीन आरोपींनी केली. या प्रकरणी या तिघांवर मोर्शी पोलिसांनी गुन्हे नोंदविले असून तपास सुरू आहे. याप्रकरणी 'मोर्शीत तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल' या मथळ्याखाली ८ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले आहे. या त्रिकुटांनी लोकांची फसवणूक करताना जिल्हा उद्योग केंद्राचे कर्ज मागणी अर्ज लोकांकडून भरुन घेतले. लाभ प्राप्त करून देण्याच्या नावाखाली लोकांकडून मोठी रक्कम वसूल केली. जिल्हा उद्योग केंद्राकडे आरोपींपैकी वाघमारे याने एकूण ६५ लोकांचे कर्ज मागणी अर्ज सादर करण्याचा प्रयत्न केला. तथापि जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्जाची प्रकरणे विहीत कार्यपध्दतीने येतात. त्यात कर्ज मागणीदाराकडे संबंधित अधिकारी भेटी देतात. तपासणी करतात आणि त्यांच्या शिफारशीनंतरच कर्ज मागणी अर्ज जिल्हा उद्योग केंद्रात सादर होत असते. त्यामुळे आरोपी वाघमारे याच्याकडून जिल्हा उद्योग केंद्राने ६५ अर्ज स्वीकृत केले नव्हते आणि त्याला परत पाठविले होते.वाघमारे याने थेट जिल्हा पालक मंत्र्याचे कार्यालय गाठले आणि विशेष कार्य अधिकारी यांच्याकडून 'महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग महामंडळ’ या नावाने १ मार्च २०१५ रोजी पत्र प्राप्त करवून घेतले. त्यात ‘निवेदन आवश्यक कार्यवाहीकरिता आपले कार्यालयास पाठविण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. थेट जिल्हा पालकमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचे पत्र पाहून शेवटी जिल्हा उद्योग केंद्राने दडपणाखाली येऊन ६५ लोकांचे कर्ज मागणी अर्ज वाघमारे यांच्याकडून स्वीकृत करवून घेतले आहे. मागील सहा महिन लोटून गेल्यावरही कर्जाची प्रकरणे मंजूर झाली नाहीत, हे पाहता फसवणूक झालेल्यांनी पैसे परत मागण्याचा तगादा लावला असता आरोपी त्यांना जिल्हा पालक मंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी यांचे १ मार्च चे पत्र दाखवून कर्ज आज ना उद्या मिळणार असल्याची बतावणी करीत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याच पत्राच्या आधारे आरोपी मंडळी इतरांचीही फसवणूक करणार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.