शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

अमरावतीत काँग्रेस नेत्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 15:08 IST

शासन धोरणाचा निषेध : यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख आक्रमक

अमरावती : नाफेडची केंद्र त्वरित सुरू करून, तूर, हरभ-याचे चुकारे त्वरित करावे, यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप व जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा कचेरीवर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत काँग्रेस नेत्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडल्याने अनुचित प्रसंग टळला.

शेतक-यांच्या प्रश्नांवर शासन टाळाटाळ करीत आहे. किंबहुना शासनाचे शेतकरी विरोधी धोरण असल्यामुळे खरिपाच्या तोंडावर आर्थिक अडचणीतील शेतक-यांवर आत्महत्येची वेळ आली. आम्ही शेतक-यांना मरू देणार नाही, प्रसंगी आम्ही शेतक-यांसाठी जीव द्यायला तयार आहोत, ही भूमिका घेत काँग्रेस नेत्यांनी शासन धोरणाचा निषेध करीत सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा कचेरीवर धडक दिली व रॉकेल अंगावर घेऊन सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी वेळीच रॉकेलसह कीटकनाशकाची बॅग ताब्यात घेऊन आत्मदहणाचा प्रयत्न हाणून पाडला. २९ मे रोजी काँग्रेस पक्षाद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शेतकºयांच्या मागण्या रेटून धरल्या होत्या. दोन दिवसात मागण्यांची पुर्तता न झाल्यास १ जूनला सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, राज्याचे कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे निधन झाल्यामुळे त्या दिवशीचे आंदोलन स्थगित करून ते सोमवारी करण्यात आले.

यावेळी आंदोलकांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. या परिसरात येणारे सर्व मार्ग पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले. यावेळी उपस्थित शेकडो पोलीस, चार्ली कमाण्डो, दंगा नियंत्रण पथक आदींमुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनासह पोलिसांची दमछाक झाली. आंदोलनात जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख, वनिता पाल यांच्यासह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीPandurang Phundkarपांडुरंग फुंडकर