शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; खासदार नवनीत राणांची केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 5:04 PM

अतिवृष्टीमुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर सिंह यांची भेट घेऊन केली.

ठळक मुद्देअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रति हेक्टर ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची केली मागणी

अमरावती : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक पीकं पाण्याखाली गेले, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली. 

विदर्भ, मराठवाड्यात सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. सोयाबीनला कोंब फुटले, कापसाची बोंडे सडली, तुरीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयात केल्याने सोयाबीनला फक्त चार ते पाच हजाराचा भाव मिळत आहे. केंद्र सरकारने फसल बीमा योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नवनीत राणा यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर सिंह यांची भेट घेऊन केली.

दरम्यान अतिवृष्टीमुळे विदर्क्ष मराठवाड्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून आता करावे तरी काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थिती त्यांना मदतीचा हात म्हणून सरकारने तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीnavneet kaur ranaनवनीत कौर राणाNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर