शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

तंटामुक्त समित्या कागदावरच

By admin | Published: February 26, 2016 12:27 AM

गावातील शांतता, सुव्यवस्था कायम राहून सौदार्याचे वातावरण राहावे व गावातील लहानसहान तंट्याचा गावातच निपटारा.

गावपातळीवरचे चित्र : थेट पोलीस ठाण्यांतच जातात तंटे, गुन्ह्यांचीही होते नोंदअमरावती : गावातील शांतता, सुव्यवस्था कायम राहून सौदार्याचे वातावरण राहावे व गावातील लहानसहान तंट्याचा गावातच निपटारा. होऊन नागरिकांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागू नये म्हणून शासनाने प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या गठित करण्यात आल्या हल्ली अनेक गावात लहानमोठ्या कारणावरुन निर्माण होणाऱ्या वादाच्या तक्रारी गावात न मिटता थेट पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदविला जात असल्याने शासनाच्या मूळ उद्देशालाच बगल दिला जात आहे. त्यामुळे तंटामुक्त समित्या कागदावरच अस्तित्वात असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. गावपातळीवर सर्व समाज घटकांनी गुण्यागोविंदाने राहावे, आपसातील तंटे, गाव पातळीवरच निपटारा करुन गावात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी व यामधून गावाची एकात्मिता कायम राहून गावाचा विकास साधला जावा, यासाठी शासनव्दारा प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्ती राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गावातील तंटे गावातच मिटवून सर्व धार्मिक उत्सव शांततेत पार पाडणाऱ्या गावांना लोकसंख्येनुसार बक्षीस दिले जाते. सुरुवातीला या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट असणारी प्रकरणे सामोपचाराने मिटवून निकाली काढण्यात आली. अनेक गावांना तंटामुक्ती संदर्भात बक्षीस मिळाले. मात्र अलिकडच्या काळात एक दोन वर्षात तंटामुक्त समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडीत गावपातळीवर राजकारण घुसले, सक्षम नेतृत्व मिळाले नाही, पोलिसांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन नाही, यामुळे या समित्या कागदोपत्रीच अस्तित्वात असल्याचे दिसून येते. अगदी लहानसहान तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत जात असून गुन्हे नोंदविल्या जात आहे. पोलिसांनाही आर्थिक लाभ होत असल्याने वाद मिटविल्यापेक्षा गुन्हे नोंदविल्या जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे अनेक प्रकरणांचे पर्यावरण मोठ्या बखेड्यामध्ये झाल्याची कित्येक उदाहरणे पोलिसांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतल्यास गावपातळीवर हे अभियान यशस्वी होऊ शकते. तसेच भविष्यात वाद निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक तंटामुक्ती समित्यांनीदेखील सक्रीयतेने कार्यान्वित राहण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)