शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

बाजार समितीसाठी काँग्रेस विभागली, भाजपमध्येही गटबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 11:28 AM

वरूड बाजार समितीसाठी सहकारातील दोन पॅनलमध्ये थेट लढतीची शक्यता

वरूड (अमरावती) : सहकारात प्रतिष्ठित केलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागला गेला, तर भाजपमध्येही गटबाजी झाली आहे. यामध्ये काँग्रेस (ठाकरे गट) आणि भाजपचे सहकार पॅनेल तसेच काँग्रेस (कराळे गट)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी परिवर्तन पॅनेल आमनेसामने आहे. यासाठी दोन्ही गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

२३ नोव्हेंबर १९३१ मध्ये स्थापन झालेल्या या बाजार समितीचे सहकारातील अन्य गटांनी नेतृत्व केले असले तरी बहुतांश वेळा काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस गटाचीच सत्ता राहिली आहे. दहा वर्षांपासून कॉंग्रेसची सत्ता होती. त्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस हर्षवर्धन देशमुख यांच्या गटाने सत्ता मिळविली. कॉंग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे गटाकडेही दहा वर्षे कार्यकाळ राहिला आहे. बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी ५४ उमेदवार सध्या रिंगणात आहेत. यामध्ये उमेदवारी अर्जाच्या माघारीनंतर म्हणजेच २० एप्रिलनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

सहकारात गटा-तटात विभागलेल्या पक्षांनी आता मतदारांच्या भेटीगाठी, गृहभेटी सुरू केल्या आहेत. बाजार समितीमध्ये १७१७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये ६०६ मतदार ग्रामपंचायत मतदारसंघात, ६६७ सेवा सोसायटी, ६९ मापारी हमाल आणि ३७५ व्यापारी मतदारांचा समावेश आहे. प्रत्यक्षात अटीतटीच्या व अस्तित्वाच्या लढतीत कोण बाजी मारणार हे ३० एप्रिलच्या मतदानानंतर ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या सहभागाने होईल विकास

शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण करण्यात आलेली बाजार समिती आता आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेली आहे. बाजार समितीपासून सर्वसामान्य शेतकरी कोसोदूर आहे. त्यामुळे उत्पादित कृषी मालावर आधारित प्रकल्प सुरू केल्यास बाजार समितीला सुगीचे दिवस येतील, असे माजी जि.प सदस्य राजेंद्र बहुरूपी यांनी सांगितले.

उत्पन्नाचे स्रोत वाढविणार केव्हा?

पुर्वी जिनिंग प्रेसिंग, भाजीपाला फळे, संत्रा, कापूस मार्केट अशा विविध मार्गाने बाजार समितीला सेस मिळायचा. परंतु शासनाने भाजीपाला नियमन मुक्ती केली. सोबतच अन्य स्रोतही बंद केल्याने बाजार समिती आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाली. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढविणे महत्त्वाचे असल्याचे पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी सांगितले.

कॉंग्रत्चा एक गट भाजपासोबत, दुसरा राष्ट्रवादीकडे!

तालुक्यात कॉंग्रेसचे दोन गट असून नरेशचंद्र ठाकरे गटाने भाजपचे खा. अनिल बोंडे गटाशी हातमिळवणी केलेली आहे तर गिरीश कराळे गट हर्षवर्धन देशमुख, आ. देवेंद्र भुयार यांच्या राकाँ गटासोबत आहे. भाजपतदेखील गटबाजी असून एक गट नाराज असल्याचा फायदा राष्ट्रवादीच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAmravatiअमरावतीcongressकाँग्रेसBJPभाजपा