शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
2
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
3
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
4
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
5
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
6
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
7
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
8
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
9
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
10
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
11
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
12
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
13
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
14
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
15
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
16
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
17
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
18
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
19
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
20
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!

प्रलोभन देऊन मिळविली संमती; बालविवाहानंतर जबरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 5:00 AM

पैशाचे आमिष देऊन अमोल सोळंके याने मुलीच्या नातेवाईकांची संमती मिळविली. त्या बालविवाहासाठी अल्पवयीन मुलीला अकोला जिल्हयातील एका गावात महिलेच्या घरी नेण्यात आले. तेथे अन्य पाच आरोपींनी त्या मुलीचा अमोल सोळंके सोबत जबरीने बालविवाह करून दिला. त्यानंतर तिला भातकुली तालुक्यातील एका गावी नेण्यात आले. तेथे ती अमोल सोळंके याच्या घरी एक ते दीड महिना राहिली. त्या कालावधीत आरोपी अमोल सोळंके याने त्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अल्पवयीन मुलीच्या पालकांना पैशाचे प्रलोभन देऊन तिच्याशी लग्न केल्यानंतर तिचा लैंगिक छळ करण्यात आला. चार ते पाच महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी २८ मे रोजी रात्री १२.२३ वाजता एका महिलेच्या तक्रारीवरून चार पुरुष व दोन महिलांविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२), (एन), ३२३, ५०६, ३४, पोस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल केला.  तक्रारीनुसार,  एका अल्पवयीन मुलीवर हा प्रसंग उद्भवला.  तक्रारकर्ता महिलेच्या एका नातेवाईकास फोन करून मला तुमच्या नातेवाईक मुलीशी लग्न करायचे आहे, असे आरोपी अमोल सोळंके (३५, ता. भातकुली) याने कळविले. मात्र, त्या लग्नाला अल्पवयीन मुलीने नकार दिला. त्यावेळी पैशाचे आमिष देऊन अमोल सोळंके याने मुलीच्या नातेवाईकांची संमती मिळविली. त्या बालविवाहासाठी अल्पवयीन मुलीला अकोला जिल्हयातील एका गावात महिलेच्या घरी नेण्यात आले. तेथे अन्य पाच आरोपींनी त्या मुलीचा अमोल सोळंके सोबत जबरीने बालविवाह करून दिला. त्यानंतर तिला भातकुली तालुक्यातील एका गावी नेण्यात आले. तेथे ती अमोल सोळंके याच्या घरी एक ते दीड महिना राहिली. त्या कालावधीत आरोपी अमोल सोळंके याने त्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

मारहाणीमुळे परतली तर म्हणाला जीव देतोदारू पिऊन अमोलने त्या अल्पवयीन मुलीला मारहाण केली. कुठल्याही कारणावरून होत असलेल्या मारहाणीमुळे ती माहेरी परतली. त्यावर त्याने मोबाईल कॉल करून तू घरी परत ये, अन्यथा तेथे येऊन स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. याप्रकरणी अखेर तिने २८ मे रोजी वलगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अमोल सोळंके (३५), अंबादास सोळंके (५७), गजानन चंपत पवार (४०), विजय चंपत पवार व एक महिला (सर्व रा. ता. भातकुली) यांच्यासह अकोला जिल्ह्यातील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीचाही समावेश आहे.

काय म्हणतो कायदा'बालविवाह प्रतिबंध कायदा' हा महत्त्वाचा आणि मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे. या कायद्याप्रमाणे १८ वर्षांहून लहान मुलगी व २१ वर्षांहून कमी वयाचा मुलगा कायदेशीर विवाहासाठी योग्य नाहीत. वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असेल, तरी तो बालविवाह ठरतो. असा विवाह करणारी सज्ञान व्यक्ती, लग्न ठरवणारे, पार पाडणारे, हजर असलेले सर्व या कायद्यानुसार गुन्हेगार आहेत. ज्या बालक वा बालिकेचा विवाह झाला आहे; त्यांना तो मान्य नसल्यास न्यायालयात अर्ज करून रद्दबादल ठरवता येतो. बालवधूला पतीकडून किंवा तो अज्ञान असल्यास सासऱ्याकडून पोटगी मिळू शकते.

 

टॅग्स :marriageलग्न