शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
2
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
3
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
4
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
5
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
6
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
7
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
8
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
9
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
11
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
12
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
13
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
14
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
15
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
16
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
17
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली
18
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
19
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
20
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण

‘इको टुरिझम’मधून कोरकूंचा विकास

By admin | Published: September 12, 2015 12:10 AM

इच्छाशक्तीच्या बळावर विपरीत परिस्थितीतही गावाचे रूपडे पालटता येते, याचे ज्वलंत उदाहरण शहानूरच्या अडाणी आणि अशिक्षित आदिवासींनी प्रस्तुत केले आहे.

लोकमत विशेषअमरावती : इच्छाशक्तीच्या बळावर विपरीत परिस्थितीतही गावाचे रूपडे पालटता येते, याचे ज्वलंत उदाहरण शहानूरच्या अडाणी आणि अशिक्षित आदिवासींनी प्रस्तुत केले आहे. दुर्गम मेळघाटच्या कुशीत वसलेल्या शहानूर या आदिवासींच्या गावात ग्राम परिसर विकास समितीमार्फत पर्यटकांच्या सोयीसाठी विविध सुविधा पुरविण्यात येत आहे. यातून स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे. हा आगळावेगळा उपक्रम वनविभागाच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. अकोट तालुकातील शहानूर गावात जेमतेम ८० आदिवासी कुटुंब राहतात. आतापर्यंत येथील आदिवासी अठराविश्वे दारिद्र्यात जीवन जगत होते. मात्र, वनविभागाच्या मदतीने आता ते मुख्य प्रवाहात येऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होत असल्याने अलीकडे शहानुरात पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. नरनाळा किल्ला, नरनाळा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याची ओढच आता पर्यटकांना लागली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश उदल वर्मा (भा.व.से.) यांच्या पुढाकाराने व सहकार्याने ग्रामविकास परिसर समितीने समुदाय संघटनांच्या माध्यमातून वने आणि वन्यप्राणी संवर्धनाचा नवा पायंडाच कोरकुंनी पाडला आहे. वनविभागाच्या सहकार्याने येथील कोरकू आदिवासी सद्यस्थितीत येथे येणाऱ्या पर्यटकांची निवास व भोजनाची व्यवस्था तसेच सोव्हीनियार शॉप, पर्यटकांची करमणूूक व जंगल सफारी, ट्रेकिंग अशा विविध सुविधा पुरविण्यात व्यस्त आहेत. सन २०११-१२ मध्ये शहानूर गावाचे वार्षिक उत्पन्न १ लाख ३३ हजार ७६९ इतकेच होते. मात्र, या नव्या उपक्रमामुळे गावाने सन २०१४-१५ मध्ये ६ लाख ९१ हजार ५२१ इतक्या उत्पन्नाचा आकडा पार केलाय. ‘इको टुरिझम’ मुळेच हा गाव विकासाच्या प्रवाहात आलय. (प्रतिनिधी)