शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
3
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
4
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
5
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
6
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
7
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
8
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
9
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
11
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
12
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
13
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
14
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
15
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
16
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
17
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
18
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
19
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
20
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:14 AM

अमरावती : कोरोना संर्सगामुळे दोन वर्षांत उन्हाळ्याच्या काळात सतत संचारबंदी असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. विविध आजारांचे रुग्णदेखील घरीच ...

अमरावती : कोरोना संर्सगामुळे दोन वर्षांत उन्हाळ्याच्या काळात सतत संचारबंदी असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. विविध आजारांचे रुग्णदेखील घरीच असल्यामुळे या दोन्ही वर्षांत उष्माघातामुळे एकाही नागरिकांचा बळी गेला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

दरवर्षी मार्च महिन्यापासून दिवसाच्या तापमानात वाढ व्हायला सुरुवात होते व आरोग्य विभागाद्वारा उन्हापासून स्वत:ला कसे जपावे, याच्या टिप्स दिल्या जातात. गावापर्यंत जनजागृती केली जाते. उन्हाळ्याची दाहकता साधारणपणे एप्रिल ते मे महिन्यात अधिक असते व जिल्हा सामान्य रुग्णालयात दरवर्षी उष्माघात कक्ष तयार केला जातो. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आदी रुग्णालयांत उष्माघाताचा रुग्ण आल्यास कसे उपाय करावे, याविषयीचे मार्गदर्शन केले जातात. मात्र, यंदा तापमान ४० अंशांवर गेल्यानंतरही उष्माघात कक्ष तयार करण्यात आलेला नाही. २२ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात संचारबंदी असल्याने सकाळी ११ वाजतापासून रस्ते शुकशुकाट दिसून येतात. नागरिक देखील विनाकारण घराबाहेर पडत नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून जिल्ह्यात उष्माघाताचा बळी गेलेला नाही.

बॉक्स

ऊन वाढले तरी...

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ४० ते ४२ अंशापर्यंत व मे महिन्यात यापूर्वी ४६ अंशांपर्यंत तापमान गेलेले आहे. मात्र, यंदा हवामान बदलामुळे उन्हाची दाहकता वाढलीच नाही. ४२ अंशांवर तापमान गेलेच नाही. त्यामुळे उष्माघाताच्या घटना झालेल्या नाहीत. ऊन लागल्यास अनेकजन घरगुती उपायांवरही भर देत असल्याचे दिसून आले.

बॉक्स

उन्हाळा घरातच !

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीपासून सुरू झाली, ती अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात २२ फेब्रुवारीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली, ती कमी-अधिक प्रमाणात आताही सुरूच आहे. सकाळी ७ ते ११ पर्यंतच घराबाहेर पडण्याची मुभा असल्याने नागरिक ११ च्या आत घरात आहेत.

कोट

संचारबंदी व कोरोना संसर्गात्या भीतीने नागरिक शक्यतोवर दुपारी घराबाहेर पडतच नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून उष्माघाताचे रुग्ण दिसून आलेले नाही.

- डॉ श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्यचिकित्सक

पाईंटर

तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी

२०१९ : ०५

२०२० : ००

२०२१ : ००