शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पीक कर्जासाठी अडवणूक केल्यास बँकांविरुद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

खरीप हंगाम नियोजनाची बैठक ना. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात घेण्यात आली. बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार प्रताप अडसड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देपालकमंत्री : खरीप हंगाम आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप पीक हंगामात पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये. सद्यस्थितीचे गांभीर्य ओळखा. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचणी आल्यास खपवून घेतले जाणार नाही. कर्जवाटपात हयगय केल्याचे आढळल्यास बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला दिले.खरीप हंगाम नियोजनाची बैठक ना. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात घेण्यात आली. बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार प्रताप अडसड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे आदी उपस्थित होते.तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुका समित्यांनी प्रभावीपणे देखरेख, पाठपुरावा करावा. बियाणे, युरिया खतांचा पुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. त्याची कृत्रिम टंचाई होता कामा नये. कृत्रिम टंचाई किंवा ब्लॅक मार्केटिंगचा एकही प्रकार आढळता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.महावितरण विभागाकडून अनुपालनात दिरंगाई असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. वीजपुरवठा, नवीन वीज जोडणी ही कामे गतीने झाले पाहिजेत. डीपी बसविण्याच्या कामात दिरंगाई व अपप्रकार घडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. पाणीपुरवठा योजनांची कामेही तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.नियोजनाची माहिती शेतकऱ्यांपर्यत पोहोचवाकाही भागात एका कंपनीचे बियाणे निकृष्ट असल्याने पिकाचे नुकसान झाल्याची शेतकºयाची तक्रार आहे. त्याबाबत नुकसानभरपाईबाबत अहवाल पाठविण्यात आला. कृषी विभागाचे नियोजन, निविष्ठा उपलब्धता, योजना, उपक्रम, पीक मार्गदर्शन याची स्थानिक संदर्भांसह माहिती शेतकरी बांधवांपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचली पाहिजे. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून यासाठी गावोगाव माहिती, मार्गदर्शन साहित्य पोहोचावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.पोकराची अंमलबजावणी गतिमान करातालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना वेळोवेळी माहिती देऊन त्यांच्या सूचना जाणून नियोजन केले पाहिजे. पोकराच्या अंमलबजावणीची गती वाढवावी, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. ड्राय झोनमध्ये फळपीक घेण्यावर मर्यादा असते. त्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या फळपिकांची लागवड अशा ठिकाणी करून तिथे फळपीक योजना राबविणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न व्हावा, असे निर्देश ना. बच्चू कडू यांनी दिले.असे आहे खरिपाचे प्रस्तावित क्षेत्रखरिपासाठी सरासरी खरीप क्षेत्र ७.२८ लाख हेक्टर आहे. लागवडीलायक क्षेत्राच्या तुलनेत त्याची टक्केवारी ९३ टक्के आहे. कपाशीचे प्रस्तावित क्षेत्र २.६१ लाख हेक्टर, सोयाबीनचे २.६८ लाख हेक्टर व तुरीचे १.१० लाख हेक्टर, तर मूग व ज्वारीचे प्रत्येकी ३० हजार हेक्टर, उडदाचे १० हजार हेक्टर, मक्याचे ९ हजार ५०० व इतर पिकांचे ९ हजार ६१२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असल्याचे एसएओ विजय चव्हाळे यांनी सांगितले. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर