शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

अनधिकृत फलकबाजांवर फौजदारीचा दंडुका

By admin | Published: November 08, 2016 12:05 AM

शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत फलकबाजांवर आता फौजदारीचा दंडुका उगारण्यात येणार आहे.

महापालिकेचे आक्रमक पाऊल : तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकअमरावती : शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत फलकबाजांवर आता फौजदारीचा दंडुका उगारण्यात येणार आहे. या फलकबाजांविरोधात महापालिकेद्वारे अभियान राबविले जाणार असून सार्वजनिक मालमत्तेवर अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांविरुध्द कडक कारवाईचे निर्देश उपायुक्त (सामान्य) महेश देशमुख यांनी दिले आहेत.जयस्तंभ चौक असो वा राजकमल, गांधी चौक असो वा चित्रा चौक, प्रत्येक चौकांमध्ये अनधिकृत जाहिरातदारांनी अतिक्रमण केले आहे. त्याकडे बाजार व परवाना विभागाने हेतूपुरस्सर दुर्लक्ष चालविले आहे. महापालिका क्षेत्रातील विविध चौक, विद्युत खांब आणि महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सभोवताल फलके आणि अन्य जाहिराती चिटकविण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी जाहिराती लावू नयेत, असा सूचनाफलक जेथे लावलेला आहे, तेथेच हटकून राजकीय नेत्यांसह सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्यांनी फलकबाजी केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर या फलकबाजीला ऊत आला आहे. महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता गल्लीबोळात इच्छुक फलकावर झळकले आहेत. अनधिकृतपणे लागलेली ती फलके, फ्लॅक्स आणि बॅनर काढण्याची सवड बाजार व परवाना विभागाला मिळालेली नाही. त्या अनुषंगाने बाजार परवाना विभागाच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या विभागाने चालविलेली लेटलतिफी कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, अशी तंबी उपायुक्तांनी दिली आहे. राजकमल चौक आणि गाडगेनगर परिसरातील उड्डाणपुलांचे कठडे आणि पिलर्सवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिराती लावण्यात आल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. या ठिकाणी जाहिराती लावण्यास प्रतिबंध असल्याचे सूचनाफलक लावण्यात आले असतानाही फलकबाजांनी महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे निदर्शनास आल्यानंतर यापुढे अनधिकृत जाहिरातदार व प्रकाशकाविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे. थेट एफआयआरशहरात सर्वदूर लागलेले अनधिकृत जाहिरात फलक, पोस्टर, बॅनर्स संबधितांनी स्वत:हून काढून टाकावेत, अन्यथा कुठलीही पूर्व सूचना न देता संबधितांवर महाराष्ट्र मालमत्तेचे विरुपनास प्रतिबंधक अधिनियम १९९५ अंतर्गत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात येईल, अशी सक्त ताकीद महापालिकेने दिली आहे. अनधिकृत जाहिरातीसंबधित नागरिकांनी १८००-२३३-६४४० आणि १८००-२३३-६४४१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. बाजार परवाना अधीक्षकाला ‘शो-कॉज’शहरातील अनधिकृत फलकबाजीला लगाम लावण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत बाजार व परवाना विभागाच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी ५ नोव्हेंबरला ही नोटीस बजावली आहे. बाजार परवाना अधीक्षकांना त्याबाबत दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावयाचे आहे. बाजार परवाना विभागाकडून अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याबाबतची कारवाई नियमितपणे होत नसल्याने जागोजागी अनधिकृत होर्डिंग्ज चा बाजार वाढला आहे, असे निरीक्षण उपायुक्तांनी नोंदविले आहे. अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याबाबत वारंवार सूचना देऊनही कारवाई होत नसल्याने माध्यमांकडून वृत्त प्रकाशित केले जाते. त्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याचे कारणे दाखवा नोटीसमध्ये म्हटले आहे. बाजार परवाना अधीक्षक निवेदीता घार्गे यांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत दोन दिवसांत उपायुक्त कार्यालयास स्पष्टीकरण सादर करावे, असे आदेश घार्गे यांना देण्यात आलेत.