शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

पीकविमा; ३८ हजार शेतकऱ्यांनी टाळला सहभाग; ३१ जुलै रोजी संपली मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 11:12 AM

Amravati : यंदा ४.७३ लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पीकविमा योजनेत एक रुपयात सहभाग घेता येत असल्याने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी अंतिम दिवशी म्हणजेच ३१ जुलैपर्यंत ४७३२४५ शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे सहभाग नोंदविला आहे. त्यातुलनेत गतवर्षी ५,१०,०३३ शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे सहभाग घेतला होता. परतावा टाळाटाळ होत असल्याने देण्यात ३२,५७४ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग टाळला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येतो. योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपया भरून पीकविमा संरक्षण प्राप्त होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान इत्यादी जोखमीच्या बाबींचा पीकविम्यात समावेश करण्यात आला आहे. योजनेची मुदत १५ जुलै होती. मात्र, याचदरम्यान लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी केंद्रांमध्ये गर्दी होती व अनेक सेतू चालकांनी सीएससी केंद्रांचे परवाने घेतले आहेत. त्यामुळे केंद्रातील गर्दीमुळे योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ८९.२१ टक्के शेतकऱ्यांनी पीकविम्यात सहभाग घेतला आहे.

पीकविमा जिल्हास्थिती                                                २०२३                    २०२४शेतकरी संख्या                         २,३४,५२५               २,६७,०९९                       कर्जदार शेतकरी                          ४००९                   ४,२१९बिगर कर्जदार                           ४,६९,२३६             ५,०५,८१४एकूण अर्ज प्राप्त                        ५,१०,०३३              ४,७३,२४५

पीकविमा काढलेले तालुकानिहाय शेतकरीअचलपूर तालुक्यात २६,०७५, अमरावती ३५,७२३, अंजनगाव सुर्जी ३५,६३४, भातकुली ४३१७३, चांदूर रेल्वे ३२,८६३, चांदूरबाजार ३२,१६२, चिखलदरा ६७६७, दर्यापूर ६३.५७३, धामणगाव रेल्वे ३७,२०९, धारणी १३,७८९, मोर्शी ३६,४४३, नांदगाव खंडेश्वर ६१,७१३, तिवसा २७,५५८ व वरुड तालुक्यात २०,५७३ जणांनी खरिपाचा पीकविमा काढला आहे. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAmravatiअमरावती