शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पाऊस, गारपिटीने १०० हेक्टरातील पिके बाधित; वीज पडून दोन गाई मृत, दोन घरांचे नुकसान  

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 18, 2023 17:14 IST

जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

अमरावती : शनिवारी पहाटे वीज,वादळासह झालेल्या पावसाने किमान १०० हेक्टरमधील गहू, हरभरा व संत्रा पिकाचे नुकसान झाले. याशिवाय वीज कोसळल्याने चांदूर रेल्वे तालुक्यात दोन गाईंचा मृत्यू झाला, तर अचलपुरात दोन घरांचे अंशत: नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळीचे संकट आहे, अजून चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. अवकाळीच्या शक्यतेने काढणीला आलेल्या गहू, हरभऱ्याची सवंगणी व मळणी केल्याने बहुतांश शेतकरी या संकटातून बचावले आहेत. तरीही उशिरा पेरणी झालेला गहू, हरभऱ्याला याचा फटका बसला. याशिवाय संत्रा, लिंबूची फळगळ झाल्याचे दिसून येते.

जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, चांदूर रेल्वे तालुक्यात पळसखेड शिवारात रात्री वादळासह झालेली गारपीट व पावसाने काढणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला व हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेल्या आहे. याशिवाय तालुक्यात वीज अंगावर पडल्याने दोन गाई दगावल्या व अचलपूर तालुक्यात दोन घरांची पडझड झालेली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामानenvironmentपर्यावरणFarmerशेतकरीAmravatiअमरावतीagricultureशेती