शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

जिल्ह्यातील डेअरी फार्म पुनर्जीवित होणार

By admin | Published: November 14, 2016 12:14 AM

नापिकी, सततच्या दुष्काळाने विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्याच्या पशू संवर्धन ...

सर्वेक्षण : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनाअमरावती : नापिकी, सततच्या दुष्काळाने विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्याच्या पशू संवर्धन विभागाने मरणासन्न शेळी, मेंढी पालन केंद्र पुनर्जिवित करण्याचा निर्णय घेतला आहे. डेअरी फार्ममधून दुग्धगंगा वाहण्यासाठी जिल्ह्यात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.जिल्ह्यातील पोहरा व धारणी येथे शेळी, मेंढी, गाय, म्हशी पालन केंद्र आहे. यापैकी तीन पशुपालन केंद्र बंद पडले आहे. या तीनही बंद पडलेल्या पशुपालन केंद्रातील कर्मचारी अन्य ठिकाणी वर्ग करण्यात आले आहे. मात्र विदर्भात पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत दुग्धगंगा वाहिली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने डेअरी फार्म पुनर्जिवित करण्याचे निश्चित झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीसोबत जोडधंदा हा दुधाचा असून तोच प्रयोग जिल्ह्यात राबविण्याचा निश्चय शासनाचा आहे. एक डेअरी फार्म पुनर्जिवित करण्यासाठी १७ ते १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याअनुषंगाने सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. डेअरी फार्म पुनर्जिवित करण्याची जबाबदारी अकोला येथील पशुधन विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना दुधाळू गुरांचे वाटप केले जाईल. शेतकऱ्यांकडून दूध गोळा करण्यासाठी अद्ययावत दूध संकलन केंद्र साकारले जाणार आहेत. येत्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात दुग्धगंगा वाहिली पाहिजे, यासाठी शासनकर्ते सकारात्मक पावले उचलत आहेत. तसेच बंद पडलेले तीन डेअरी फार्म विकसित केले जाणार आहे. पशुधन विकास महामंडळाला डेअरी फार्म विकसित करण्यासह शेतकऱ्यांना दुधाळू जनावरांचे वाटप करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना गुरे वाटप करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना दुधाळू गुरे वाटप करण्यात आलीत त्या शेतकऱ्यांकडून चांगल्या दरात दूध खरेदी करण्याचेही प्रस्तावित आहे. (प्रतिनिधी)