शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे २१,१९९ हेक्टरमध्ये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:15 AM

अमरावती : मान्सूनच्या दमदार आगमनानंतर १० ते १२ जुलैच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात १४ तालुक्यातील ३२८ ...

अमरावती : मान्सूनच्या दमदार आगमनानंतर १० ते १२ जुलैच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात १४ तालुक्यातील ३२८ गावांमध्ये नदी, नाल्यांना पूर येऊन २१ हजार १९९ हेक्टरमधील पिके बाधित झालेली आहे. यात भिंत पडून एकाचा मृत्यू झाला. याशिवाय ४१२ घरांची पडझड झालेली आहे.

विभागात अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात पावसाने नुकसान झाले व वशिम, बुलडाण्यात स्थिती निरंक आहे. बाधित क्षेत्राच्या पंचनाम्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव, कोठा, जोडमोहा, दारव्हा, चिखली, मांगकिन्ही, बोरी, लालखेड, महागाव, तिवरी, कलगाव, आर्णी, जवळा, लोणबेहळ, अंजनखेड, गणेशपूर, शिबला, पाटनबोरी, व मालखेड मंडळांमधील १२० गावांमध्ये पावसाने नुकसान झालेले आहे. यामध्ये २८० घरांचे अंशत: नुकसान झाले. ७,९४३ हेक्टर क्षेत्रातील पिके खरडल्या गेलेली आहे. याशिवाय १२ जुलैच्या पावसाने नेर तालुक्यातील मालखेड मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने ८६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अकोला जिल्ह्यात मुर्तिजापूर तालुक्यातील १५ गावांमध्ये ६ घरे व २५ हेक्टरमधील पिके, अकोट तालुक्यातील १२ गावाममध्ये एक घराचे नुकसान व ११० हेक्टरमधील पिके, तेल्हारा तालुक्यात ३ गावांध्ये तीन घरे, बाळापूर तालुक्यातील कासारखेडमध्ये ९ वर्षांचा बालकाचा भिंत कोसळून व बटवाडी येथे एका बैलाचा वीज पडून मृत्यू झालेला आहे.

बॉक्स

अमरावती जिल्ह्यात १६६ गावे बाधित

अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले. जिल्ह्यातील १६६ गावे बाधित झाली. यामध्ये दर्यापूर तालुक्यात ११५ घरांचे अंशत: नुकसान झाले, तर १२,६६० हेक्टरमधील पिके खरडून गेली. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १२ गावे बाधित झाली व सात घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. ७४ हेक्टरमधील पिके खरडून गेली व ३३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.