शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे २१,१९९ हेक्टरमध्ये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:15 AM

अमरावती : मान्सूनच्या दमदार आगमनानंतर १० ते १२ जुलैच्या दरम्यान झालेला मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भाच्या १४ तालुक्यांमधील ३२८ ...

अमरावती : मान्सूनच्या दमदार आगमनानंतर १० ते १२ जुलैच्या दरम्यान झालेला मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भाच्या १४ तालुक्यांमधील ३२८ गावांमध्ये नदी-नाल्यांना पूर येवून २१ हजार १९९ हेक्टरमधील पिके बाधित झालेली आहे. यामध्ये भिंत पडून एकाचा मृत्यू झाला, याशिवाय ४१२ घरांची पडझड झालेली आहे.

विभागात अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात पावसाने नुकसान झाले व वरशिम, बुलडाण्यात स्थिती निरंक आहे. बाधित क्षेत्राच्या पंचनाम्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव, कोठा, जोडमोहा, दारव्हा, चिखली, मांगकिन्ही, बोरी, लालखेड, महागाव, तिवरी, कलगाव, आर्णी, जवळा, लोणबेहळ, अंजनखेड, गणेशपूर, शिबला, पाटनबोरी व मालखेड मंडळांमधील १२० गावांमध्ये पावसाने नुकसान झालेले आहे. यामध्ये २८० घरांचे अंशत: नुकसान झाले. ७,९४३ हेक्टर पिकांखालील क्षेत्र खरडल्या गेलेले आहे. याशिवाय १२ जुलैच्या पावसाने नेर तालुक्यातील मालखेड मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने ८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील १५ गावांमध्ये ६ घरे व २५ हेक्टरमधील पिके, अकोट तालुक्यातील १२ गावांमध्ये एका घराचे नुकसान व ११० हेक्टरमधील पिके, तेल्हारा तालुक्यात ३ गावांध्ये तीन घरे, बाळापूर तालुक्यातील कासारखेडमध्ये ९ वर्षांच्या बालकाचा भिंत कोसळून व बटवाडी येथे एका बैलाचा वीज पडून मृत्यू झालेला आहे.

बॉक्स

अमरावती जिल्ह्यात १६६ गावे बाधित

अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले. जिल्ह्यातील १६६ गावे बाधित झाली. यामध्ये दर्यापूर तालुक्यात ११५ घरांचे अंशत: नुकसान झाले तर १२,६६० हेक्टरमधील पिके खरडून गेली. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १२ गावे बाधित झाली व सात घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. ७४ हेक्टरमधील पिके खरडून गेली व ३३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.