शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

-हा तर कर्जमाफीचा ‘फार्स’

By admin | Published: July 01, 2017 12:12 AM

राज्य सरकारने जाहीर केलेली ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ ही कर्जमाफीची योजना शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे.

बबलू देशमुख आक्रमक : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने जाहीर केलेली ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ ही कर्जमाफीची योजना शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. या कर्जमाफीचा फायदा जिल्ह्यातील ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांना होणार असला तरी १८ हजार शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहेत. त्यामुळे शासनाने सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली आहे.जिल्हा बँकेच्या ६१ हजार ३०७ शेतकऱ्यांपैकी केवळ ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांना अटी-शर्तींेच्या अधीन राहून कर्जमाफीचा लाभ मिळेल तर ३० हजार शेतकरी वंचित राहणार आहेत. सन २०१५-१६ मध्ये पुनर्गठन केलेल्या १८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीतून पूर्णत: वगळण्यात आले आहे. त्यामुळे ही कर्जमाफी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. कर्जमाफी द्यायचीच असेल तर सरसकट द्यावी, अन्यथा जिल्हा काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बबलू देशमुख यांनी दिला आहे. सरकारने कर्जमाफी देताना केवळ सन २०१२ नंतर कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश केला आहे. तसेच कर्जपुनर्गठित करणाऱ्या शेतकऱ्यांची केवळ थकीत किस्त माफ होणार असल्याने त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कायमच राहणार आहे. सन २०१५-१६ मध्ये कर्जाचे पुनर्गठन करणारे शेतकरी योजनेपासून वंचित राहतील. त्यामुळे भाजप शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा, अशी मागणीसुद्धा बबलू देशमुख यांनी केली आहे. काँग्रेसने दिलेली कर्जमाफी सर्वात मोठीकाँग्रेस सरकारच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकारने सन २००८ मध्ये देशाच्या इतिहासात सर्वात मोठी कर्जमाफी दिली होती. खऱ्या अर्थाने ती सरसकट कर्जमाफी होती. परंतु आताच्या भाजप सरकारने कर्जमाफीत शेकडो निकष लादल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. भाजप सरकार सर्वात मोठी कर्जमाफी दिल्याचा डांगोरा पिटत असले तरी हा केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. ३० हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी फेटाळलीजिल्हा बँकेकडून शासनाने थकीत कर्जदारांची माहिती मागितली होती. बँकेने ६१ हजार ३०७ शेतकऱ्यांकडे ३०० कोटींच्या थकबाकीचे आकडे दिले होते. परंतु सरकारने ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांनाच यामध्ये पात्र ठरविले आहे. त्यामुळे ३०० कोटींपैकी अंदाजे १३० कोटींंची कर्जमाफी मिळू शकते. इतर शेतकऱ्यांना मात्र वंचित रहावे लागणार आहे.शिवाजी महाराजांचा अपमान करू नकाराज्य शासनाने कर्जमाफी योजनेला "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना" असे नाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे हा एकप्रकारे शिवाजी महाराजांचा अपमान आहे. परिणामी या योजनेचे नाव बदलून शेतकऱ्यांची फसवणूक योजना करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख दिली.