शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रेल्वेत चोरीसाठी चोरट्यांच्या सीमा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:39 PM

रेल्वे गाड्यांत चोरी करण्यासाठी चोरट्यांनी आपल्या सीमा निश्चित केल्यात, हे वाचून जरा आश्चर्य होईल. पण, ते खरे आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या आशीर्वादाने हा प्रकार बिनधास्तपणे सुरू असून, रेल्वे गाड्यांत आतापर्यंत झालेल्या घटनांत एकही चोरी उघडकीस आणण्याचे धाडस रेल्वे पोलिसांनी दाखविले नाही, हे विशेष.

ठळक मुद्देमोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ : नवख्या टोळीकडून चोरीचे धाडस, रेल्वे पोलीस अनभिज्ञ
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे गाड्यांत चोरी करण्यासाठी चोरट्यांनी आपल्या सीमा निश्चित केल्यात, हे वाचून जरा आश्चर्य होईल. पण, ते खरे आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या आशीर्वादाने हा प्रकार बिनधास्तपणे सुरू असून, रेल्वे गाड्यांत आतापर्यंत झालेल्या घटनांत एकही चोरी उघडकीस आणण्याचे धाडस रेल्वे पोलिसांनी दाखविले नाही, हे विशेष.रेल्वे गाड्यात हल्ली रेल्वे प्रवास असुरक्षित झाला आहे. रेल्वे पोलीस नेमके कसे कर्तव्य बजावतात, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. रेल्वेची मालमत्ता, प्रवासी सुरक्षिततेसाठी प्रशासनाने बडनेरा व अमरावती रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. मात्र, धावत्या गाड्यांमध्ये चेन स्नेचिंग, साहित्यांची चोरी, मोबाईल चोरी, उचलेगिरीचे प्रकार हे नित्याचीच बाब आहे. नवजीवन एक्सप्रेसने गांजा तस्करी होत असल्याचे सर्वश्रूत असूनही रेल्वे पोलीस ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा कारभार करीत आहे. गांजा कोण, कोठून, कसा आणतो, याची इत्थंभूत माहिती रेल्वे पोलिसांना असताना ठोस कारवाई का नाही? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. बडनेरासह अकोला, वर्धा, पुलगाव येथील नवख्या चोरट्यांनी रेल्वे गाड्यांना लक्ष केले आहे. यात काही बालकांचाही समावेश असल्याची माहिती आहे. बडनेरा ते अकोला आणि बडनेरा ते वर्धा, अकोला ते भुसावळ, वर्धा ते नागपूर असे चोरट्यांनी रेल्वे गाड्यात चोरींसाठी स्वत:हून सीमा आखून घेतल्या आहेत. चोरट्यांच्या या सीमेबद्दल रेल्वे पोलीस अवगत आहे. मात्र, त्यांना चोरट्यांकडून ‘रसद’ मिळत असल्याने ‘ते’ सुद्धा चुप्पी साधून आहेत. पोलिसांच्या अभयानेच चोरटे प्लॅटफार्मवरून रेल्वे गाड्यात ‘अंजाम’ देण्यासाठी प्रवास करतात. सहा महिन्यांत बडनेरा रेल्वे स्थानकावर गाडी सुरू होताच चेन स्नेचिंगचा चार घटना घडल्या आहेत. याप्रकरणी रेल्वे पोलिसात तक्रारादेखील झाल्यात.मोबाईल चोरीसाठी नवख्या टोळीचे पदार्पणरेल्वे गाड्यात प्रवाशांकडील महागडे मोबाईल क्षणात उडविण्याची किमया करणारे नवख्या टोळीने पदार्पण केले आहे. १२ ते २५ वयोगटातील काही युवकांसह बालकांचाही यात समावेश असल्याची माहिती आहे. प्रवाशाकडील साहित्य चोरी करण्यात त्यांचा हातखंडा असून, मोबाईल चोरण्यास ते पटाईत आहे. मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने वाढ होत असताना रेल्वे पोलिसांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.चोरीच्या घटनांची पोलिसात तक्रार नोंदविली जात नाहीलांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. रेल्वेत ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची घटना घडते, त्याबाबत दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्याद नोंदविणे कठीण जाते. अशातच प्रवासी हे बाहेरील असल्याने ते आपल्याकडील साहित्य, कुटुंबीयांना सोडून पोलिसात तक्रार नोंदविण्यास जाऊ शकत नाही. त्यामुळे रेल्वे गाड्यांत अनेक चोरीच्या घटना घडूनदेखील तक्रारीअभावी पोलिसात नोंद केली जात नाही. त्यामुळे रेल्वे गाड्यांत चोरीच्या घटनांमध्ये नियमित वाढ होत आहे. याला आळा घालणे गरजेचे झाले आहे.रेल्वे स्थानकाच्या सीमेवर चोरट्यांवर पाळत ठेवण्यासाठी साध्या पोषाखात पोलीस तैनात करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एक मोबाईल चोर पडकला असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. चोरीची तक्रार प्राप्त होताच त्या दिशेने तपास करून चोरट्यांना जेरबंद केले जाते.- पी. व्ही. चक्रे, पोलीस निरीक्षक, बडनेरा रेल्वे