शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

कोरोना चाचणी अहवालाला होणारा विलंब ठरु शकतो घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:14 AM

वनोजा बाग : तालुक्यात कोरोनाचा कहर सुरु असुन ग्रामीण व शहरी रुग्णांच्या आकडेवारी आणि मृत्यूचे प्रमाण पाहता ...

वनोजा बाग : तालुक्यात कोरोनाचा कहर सुरु असुन ग्रामीण व शहरी रुग्णांच्या आकडेवारी आणि मृत्यूचे प्रमाण पाहता सर्वसामान्य जनतेच्या छातीचे ठोके वाढत चालले आहेत. परंतू रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त होण्यासाठी पाच दिवसा पेक्षा जास्त वेळ लागत असल्याने तो विलंब घातक ठरण्याची चिन्हे आहेत.

तालुक्यातील ग्रामिण भागातील बऱ्याच गावात दिवसेंगणीक होत असलेला कोरोनाचा विस्फोट व बाधीत रुग्णापैकी होणारी मृत्यूची आकडेवारी चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना जागरुक नागरिकांचा कल आपली तपासणी करण्याकडे आहे.

लखाड येथील एका कुटुंबात १४ मे रोजी एक जण पॉझिटिव्ह निघाल्यानंतर कुटूंबातील सर्वांनीच दुसऱ्या दिवशी कोरोना चाचणी करुन घेतली. त्यातील दोघांची अँन्टीजन टेस्ट निगेटीव्ह आली. परंतू एकाची आरटीपीसीआर टेस्ट केल्याने रिपोर्ट यायची वाट पहावी लागली. तब्बल पाच दिवसानंतर संबंधित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संक्रमित रुग्णाच्या संपर्कात येणारी व्यक्ती काळजीने आपली तपासणी करुण घेण्यास तयार आहे. परंतु अहवाल मिळण्यास उशिर होत असल्याने जो व्यक्ती संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेला असतो. त्यामुळे धोेका अधिक वाढतो.