शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

आजीबाईचा बटवा अन्‌ कोरोनाला हटवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:10 AM

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भाग घेरला गेला. यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. ग्रामीण भागात अनेक आजारांवर ...

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भाग घेरला गेला. यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. ग्रामीण भागात अनेक आजारांवर घरगुती उपचाराची पद्धत आहे. कोरोनावरही गुळवेलचा काढा, हळद, तुळस आदींचा वापर ग्रामस्थ करीत असल्याचे चित्र आहे.

मार्च महिन्यांपासून जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील एकूण १,२२५ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यातच २४८ गावे हॉटस्पॉट ठरले आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढल्याने ग्रामस्थांमध्ये कोरोनाची भीती वाढली आहे. या भीतीतूनच अनेकजण लक्षणे नसली तरी घरगुती उपचार करीत असल्याचे वास्तव आहे. यात वाफ घेणे, हळद दुधातून किंवा पाण्यातून घेणे, तुळस, अश्र्वगंधा आदींचा उपयोग करण्यात येत आहे. ग्रामीण भागात अजूनही ताप आल्यास अनेकजण कडुनिंबाच्या पानाचा रस पितात. वयोवृद्ध मंडळी विविध आजारांवर घरगुती उपचार सुचवितात. सध्या ग्रामीण भागात गुळवेलच्या काढ्याला मागणी वाढली आहे. कडुनिंबाच्या झाडावर वाढलेली गुळवेल गुणकारी आहे.

-----------------

आयुर्वेद हा संपन्न वारसा लाभलेल्या औषध चिकित्सेतील उत्तम पर्याय आहे. आयुर्वेदात जठराग्नीला प्रमुख महत्त्व दिलेले आहे. जेठराग्नी सक्षम असेल तर घेतलेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते. अग्नी प्रदिप्त ठेवणे हीच प्रथम चिकित्सा आहे. सम्यक आहार, विहार, व्यायाम, प्राणायम, योगा या घटकाचा वापर करावा.

- आश्लेषा वानखडे, आयुर्वेदाचार्य

-----------------

कशाच्या काय फायदा?

हळदीमुळे वाढते रोग प्रतिकारशक्ती

हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते. रक्त शुद्ध होते. त्वचेचा रंग उजळतो. ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारामाही आहे. हळद चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदूच्या विकारापासून संरक्षण मिळते. पचनक्रिया सुधारते.

------------

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी

आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन असते. त्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज आवळ्याचे सेवन करणे आवश्यक आहे. यातील जीवनसत्वामुळे त्वचेतील पेशी जलदगतीने दुरुस्त होतात. व्हिटॅमिन सी आपल्या डोळ्यातील रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यापासून रोखण्याचे कार्य करते.

-----------------------

गुळवेलचा वापर वाढला

गुळवे, कफ कमी करण्यास मदत करते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते. यामुळे दमा आणि खोकला यासारख्या आजारापासून बचाव होतो आणि फुफ्फुसांना निरोगी ठेवता येते. तसेच गुळवेल हे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठ, गॅस व इतर समस्या दूर करण्यास मदत करते. त्यामुळे गुळवेल लाभदायक आहे.

-------------

आजीबाईंच्या बटव्यात काय?

मीठ व गरम पाण्याने गुळण्या केल्यास घसा दुखणे कमी होते. तसेच गुळवेलचा काढा घेतल्यास ताप, सर्दी खोकला कमी होतो. त्यामुळे काढ्याचा उपयोग करतो.

- किरण गोपाळराव खांडेकर

------------

कोरोना झाल्यानंतर सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असतात. यावर आधीपासून घरगुती उपचार करण्यास येतात. ताप असल्यास आम्ही गुळवेलचा काढा घेतो. तसेच कडुनिंबाच्या पाल्याचा रसही तापावर गुणकारी ठरतो.

- पार्वताबाई किसनराव पांडे

--------------

सर्दी, कफ वाढल्यास गरम पाण्याची वाफ घ्यावी तसेच तुळस, मिरे, लवंग, दालचिनी, सूंठ आदी एकत्रित करून त्याचा काढा आम्ही घेत असतो. हाच उपाय ती इतरांना सांगते.

- शारदा मनोहराव बांबोडे