शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

नाराजीचा फुटला बांध.., खासदारांना ‘घरचा अहेर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 14:01 IST

भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षांचा खासदारांवर आरोप

वरूड : वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांचे मोर्शी मतदारसंघावर दुर्लक्ष असल्याने केंद्रात सरकार असतानासुद्धा कुठलेही ठोस विकास काम झाले नाही. यामुळे पक्षाचे कार्यकर्ते दुरावले जात असल्याचा आरोप भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांनी केला आहे. काही युवा नेत्यांनीच आता खासदारांविरुद्ध रणशिंग फुंकल्याने निवडणुकीच्या तोंडावर खा. तडस अडचणीत येण्याची शक्यता आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघात वरूड-मोर्शी मतदार विधानसभा संघाची छाप नेहमीच राहिली आहे. नऊ वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असताना खा. रामदास तडस यांच्याद्वारा कार्यकर्त्यांशी संपर्कसुद्धा अत्यंत कमी आहे. या भागाकडे दुर्लक्ष केल्याने केंद्र शासनाच्या योजना अथवा मोठे प्रकल्प राबविले गेले नसल्याचा या कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

सन २०१९ च्या निवडणुकीत विधानसभेची जागा गमावल्याची खदखद कार्यकर्त्यांमध्ये आहे. भाजपची अवस्था चांगली असतानासुद्धा अंतर्गत हेव्या-दाव्यातून मतदारसंघ गमाविला गेल्याची वाच्यता खुद्द भाजपतील काही युवा कार्यकर्त्यांनी केली आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या एक वर्षापूर्वीच नाराजीचा बांध फुटायला सुरुवात झाली आहे. नाराज गटापैकी एकाने निवडणुकीसाठी उघडउघड आव्हान दिल्याने खासदार तडस यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कार्यकर्त्यांना डावलून अन्य पक्षांना निधी

खारदास तडस यांच्या विकास निधीमधील कामे कमिशन दिल्याशिवाय मिळत नाहीत. निष्ठावान कार्यकर्त्यांना सोडून दलालामार्फत अन्य पक्षातील लोकांना निधी दिला आहे. विकास निधीकरिता पैशांची मागणी केली जात आहे. एकूणच खा. तडस यांनी तालुकाच वाऱ्यावर सोडल्याचा आरोप श्रीराव यांनी केला आहे.

निधी विकण्यासाठी पक्षाची खासदारकी?

स्थानिक विकास निधीअंतर्गत आवश्यक लहान-मोठी कामे होणे अपेक्षित असते. मात्र, केवळ संस्था आणि क्रीडा साहित्याकरिताच का निधी दिला जातो. ग्रामपातळीवर विकासकामांना निधी दिला जात नाही. निधीकरिता पैशाची मागणी केली जात असल्याने निधी विकण्यासाठी खासदारकी दिली काय, असा सवाल श्रीराव यांनी केला.

पुसला येथे रेल्वेचा थांबासुद्धा आतापर्यंत देता आलेला नाही. खा. तडस यांच्याद्वारा कार्यकर्त्यांना डावलून दलालामार्फत निधी विकला जात आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. विकास कामांची वाट लागली आहे.

- विजय श्रीराव, माजी जिल्हा उपाध्यक्ष, भाजप

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाRamdas Tadasरामदास तडस